"दर वर्षी सारसबागेत पाडव्याची सकाळी दीपोत्सव असतो, दुस-या दिवशी पेपरमध्ये छान फोटो पाहून खूप काही मिस केले अशी भावना होते, ते काहीनाही,या वर्षी पहाटे साडेचारला सारसबागे जायचेच,बर का"
बायकोने फर्मान काढले.
गेलो.
अगदी साडेचार जमले नाही. पाच वा.गेलो. काय झाले.
महान दिपोत्सव वगैरे काही नव्हता.थोडाफार सुंदर लावलेल्या भारताच्या नकाशाच्या आकारात पणत्या होत्या.
सुंदर संस्कारभारती रांगोळ्या होत्या पण थोड्याच.
मग काय होते.
उन्माद.
अनियंत्रीत गर्दी.
अनावर उत्सुकता
एका कोप-यात आॅर्केस्ट्रा होता.
यावेळचे आकर्षण म्हणजे चीनी कंदील. रु.100 ला 3.
हि कल्पना एव्हढी हिट झाली की आकाश कंदीलांनी भरून गेले.
कंदीलांचे लक्ष थवे
गगनाला रंग नवे
(नाधो महानोरांची क्षमा मागुन)
हे आधी का झालं नाही?
कारण या आधी तो आंत्रप्रीनर चीनी (अलीबाबा ?) जन्मला नव्हता.
लो काॅस्ट कंदील डिझाईन / जास्त वेळ जळत रहाणारा काकडा इंधन शोधले नव्हते.
ज्याअर्थी 30 रू. ला विकूनही फायदा होतो, त्याअर्थी काॅस्टप्राइस 2 रू. असावी
सुरक्षेचे काय?
पोलीसयंत्रणा बघ्याची भूमिका घेत होती. कारण नो इंस्ट्रक्शन / कायद्याचे अज्ञान / चिरीमिरी (?)असणार.
आगीचा धोका आहेच.
एक कंदील वर जाण्याऐवजी खाली येवू लागला, बहूदा लीक होत असावा,गर्दीतील एका मुलीच्या डोक्यावर पडणार इतक्यात प्रसंगावधान राखून एका उंच मुलाने तो वरच्यावर धरला व मग बाजूला टाकला, इतरांनी चटकन पायाने तो जळता टेंभा विझवला.
सव्वासहा वाजताही नटनेल्या मुली /स्त्रिया, नवीन कपडे धारण केलेले लोकांचा एकचं उद्देश होता,
चलो सारसबाग.
का? तिथे काय आहे?
ही समाजाची एक भावनीक गरज होती, नवीन कपडे धारण केले असतांना कुठेतरी "हॅपनींग" ठिकाणी जाणे, मिरविणे,हि त्या वेळची गरज होती.
अशा वेळी त्या सारसबागेची क्षमता किती, बाहेर पडण्याचे सुरक्षीत मार्ग आहेत का? जर काही अनुचीत प्रकार घडला तर चेंगराचेंगरीतून वाचायचे कसे??
कोण विचार करतो.
सात वाजलेतरी उशीरा उठलेले लेटलतीफ लोंढे सारसबागेच्या दिशेने जातचं होते
बायकोने फर्मान काढले.
गेलो.
अगदी साडेचार जमले नाही. पाच वा.गेलो. काय झाले.
महान दिपोत्सव वगैरे काही नव्हता.थोडाफार सुंदर लावलेल्या भारताच्या नकाशाच्या आकारात पणत्या होत्या.
सुंदर संस्कारभारती रांगोळ्या होत्या पण थोड्याच.
मग काय होते.
उन्माद.
अनियंत्रीत गर्दी.
अनावर उत्सुकता
एका कोप-यात आॅर्केस्ट्रा होता.
यावेळचे आकर्षण म्हणजे चीनी कंदील. रु.100 ला 3.
हि कल्पना एव्हढी हिट झाली की आकाश कंदीलांनी भरून गेले.
कंदीलांचे लक्ष थवे
गगनाला रंग नवे
(नाधो महानोरांची क्षमा मागुन)
हे आधी का झालं नाही?
कारण या आधी तो आंत्रप्रीनर चीनी (अलीबाबा ?) जन्मला नव्हता.
लो काॅस्ट कंदील डिझाईन / जास्त वेळ जळत रहाणारा काकडा इंधन शोधले नव्हते.
ज्याअर्थी 30 रू. ला विकूनही फायदा होतो, त्याअर्थी काॅस्टप्राइस 2 रू. असावी
सुरक्षेचे काय?
पोलीसयंत्रणा बघ्याची भूमिका घेत होती. कारण नो इंस्ट्रक्शन / कायद्याचे अज्ञान / चिरीमिरी (?)असणार.
आगीचा धोका आहेच.
एक कंदील वर जाण्याऐवजी खाली येवू लागला, बहूदा लीक होत असावा,गर्दीतील एका मुलीच्या डोक्यावर पडणार इतक्यात प्रसंगावधान राखून एका उंच मुलाने तो वरच्यावर धरला व मग बाजूला टाकला, इतरांनी चटकन पायाने तो जळता टेंभा विझवला.
सव्वासहा वाजताही नटनेल्या मुली /स्त्रिया, नवीन कपडे धारण केलेले लोकांचा एकचं उद्देश होता,
चलो सारसबाग.
का? तिथे काय आहे?
ही समाजाची एक भावनीक गरज होती, नवीन कपडे धारण केले असतांना कुठेतरी "हॅपनींग" ठिकाणी जाणे, मिरविणे,हि त्या वेळची गरज होती.
अशा वेळी त्या सारसबागेची क्षमता किती, बाहेर पडण्याचे सुरक्षीत मार्ग आहेत का? जर काही अनुचीत प्रकार घडला तर चेंगराचेंगरीतून वाचायचे कसे??
कोण विचार करतो.
सात वाजलेतरी उशीरा उठलेले लेटलतीफ लोंढे सारसबागेच्या दिशेने जातचं होते