Tuesday, 28 April 2015

ग़म इक चिठ्ठी जिसमें ख़ुशियों का सन्देश (?!)



1979 साल मध्ये एक हिंदी फिल्म आली होती, सरगम.

काहींना ते आठवत असेल, हिट पिक्चर होतं, गाणीही खुप गाजली.
लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत होतं.
गीतकार होते आनंद बक्षी. 'परबत के इस पार' या गाण्यात ते लिहून गेले,

ग़म इक चिठ्ठी जिसमें ख़ुशियों का सन्देश
गीत तभी मन से उठता है जब लगती है ठेंस

ह्या ओळी आनंद बक्षी साहेबांनी का लिहील्या असतील ? हा प्रश्न मला अनेक वर्षे पडला आहे.
बरं,स्टोरीलाईनची गरज म्हणून लिहीलंअसेल म्हणावं तर बक्षी हे सिध्दहस्त कवी होते. त्यांनी हजारो गाणी लिहीली.
अतिशय कल्पक होते.यमकांचे गुलाम नव्हते.एवढचंकाय तर गाण्यांची व्याख्या बदलून टाकणारे नवकवी होते.
गाणी लिहीणे हे त्यांच पॅशन होत.

ते कायमच छंद मात्रा युक्त गाण्यातचं विचार करल असावेत असे मानले तरी चालेल.
मग

ग़म इक चिठ्ठी जिसमें ख़ुशियों का सन्देश
गीत तभी मन से उठता है जब लगती है ठेंस

दुसरी ओळ पटण्यासारखी आहे. वेदनेतून एखादी सर्जनशील गोष्ट निर्माण होऊ शकते !

(बीज आतुनी फुटुनी गेले ,वेदनेत या फूल जन्मले
अमरपणाचा अर्थ आकळे मरण झेलूनी घेताना ----पाडगावकर)


पण पहील्या ओळीचं काय?
पुरेपुर विरोधाभास भरला आहे त्यात....

मी माझ्या समाधानासाठी उदाहरणं शोधायला लागलो.

अहील्याबाई होळकर ,नवरा अल्पजीवी निघाला.वैधव्य कोसळलं, पण सासरे पुरोगामी विचारांचे होते, त्यांनी मन वळवून अहील्याबाईंना राज्यकारभार सोपवला व एक कर्तृत्ववान ,प्रजाहितदक्ष काम करणार्या म्हणून त्या प्रसिध्द झाल्या.

दुसरं तसचं, देशाचा प्रधान बाॅंबस्फोटात मारला गेला आणि राजकारण राहु द्या ,साधी भाषा न येणारी गृहीणी , दहा वर्ष राजकारणात जरब बसवून ,जगातील शक्तीशाली महीला ठरली.

उत्तर शोधण्यासाठी आनंदबक्षी यांच्याच संघर्षाकडे बघीतलं तर
 सिनेगीतकार होण्यासाठी ते दोन वेळा मुंबईला आहे व अपयशी ठरुन परत गेले ,तिस-या वेळी कर्ज वगैरे होऊन गांजून परत निघाले पण मित्राने आधार दिला,त्यानंतर त्यांनी मोठे यश मिळवलं.

वाचकांना याचं काही वेगळं interpretation सांगता येईल का?
(अपूर्ण)