Friday, 22 May 2015

Business Ashram : Suresh Hundare - An inspiring wonder - सुरेश हुंदरे – एक अनुकरणीय आश्चर्य

This inspiring article written by
श्रीकांत कुलकर्णी
९८५००३५०३७
Shrikantkulkarni5557@gmail.com

सुरेश हुंदरे गेले हे कळले क्षणभर मन सुन्न झाले. सुन्न होणे ही मनाची नैसर्गिक प्रतिक्रिया. पण सुरेश हुंदरे अचानक आपल्यातून जाणे म्हणजे पुढच्या पिढीने ज्या दिव्याकडून प्रकाश मिळवायचा तोच अकाली विझल्यासारखे झाले आहे. कोण होते सुरेश हुंदरे तर अतिशय मार्मिकपणे सांगता येईल. टी.व्ही वर आबुराव आणि बाबुराव ही बतावणी पात्रे आपल्या वडिलांचे बढाईखोर पराक्रम सांगतात आबुराव म्हणतो माझे वडील एका ढान्गेत अमेरिकेत पाउल ठेवतात तर बाबुराव म्हणतात हे तर काहीच नाही माझे वडील पहिलं पाउल चंद्रावर टाकतात आणि दुसरे मंगळावर. अशाच पद्धतीने मी जर तुम्हाला सांगितले की मी असा एक माणूस पहिला आहे ज्याने आपल्या व्यावसयिक कारकीर्दीत एकही रुपयांची लाच दिली नाही आणि एक रुपयापण काळा (२ नंबर) पैसा केला नाही तर तुम्ही म्हणाल काय राव आबुराव-बाबुरावची नवी गोष्ट सांगताय काय ? पण हा माणूस असाच विलक्षण होता आणि हे सत्य होते आणि त्यांच्या ३०—३५ वर्षांच्या कारकीर्दीत १५० कोटींची उलाढाल, १०० माणसांना रोजगार हे घडले. लाच न देता धंदा काय वेडेबिडे आहात का ?  लाच देणे हे सत्य आपण किती स्वीकारले आहे की सुरेश हुंदरे हे रम्य कल्पना वाटावेत. सुरेशजींना भेटण्याचे २ प्रसंग मला आले त्यातला दुसरा आधी वर्णन करतो कारण माझ्या आयुष्यातली ती एक अभिमानाची गोष्ट आहे.
आमचे प्रिय शिक्षक कृ.ब.तळवलकर यांच्या नावाने २०११ चा “अनुकरणीय उद्योजक” हा पुरस्कार त्यांना द्यायचे आम्ही ट्रस्टी मंडळींनी ठरवले आणि त्यांची भेट घ्यायची ठरवले. त्यांच्या काही परिचितांनी ते कोणताही पुरस्कार घेत नाहीत आणि त्यांना आवडत नाहीत तेव्हा सांभाळून अशी गर्भित सूचना दिली. म्हटले जायचेच. फोन मिळवला येण्याचे कळवले त्यांनी पण “या भेटू” असा प्रतिसाद दिला. आम्ही चौघे पुण्याहून बेळगावला निघालो. तेथे त्यांचा poly-Hydron नावाने व्यवसाय आहे . सकाळी ११ वाजता त्यांच्या बिझनेस आश्रम अशी पाटी असलेल्या कार्यालयात पोहोचलो. स्वागत झाले. आत गेल्यावर स्वामी विवेकानादांचा पुतळा, सभोवताली अनेक पुस्तके व्यवस्थित लावून ठेवलेली कपाटे, भरपूर उजेड आणि मधोमध त्यांचे प्रशस्त टेबल. प्रसन्नपणे स्वागत केले. त्यांना अशा येण्याची सवय असावी कारण अनेक व्यावसायिक आणि व्यापारी संस्था शैक्षणिक संस्था त्यांच्या या बिझिनेस आश्रमास भेट देत असतात. ते स्वत: एक अभ्यास विषय झाले होते.  पुरस्काराविषयी एकदम विषय काढायचा नाही असे आमच्यात ठरले होते त्यामुळे तुमच्या व्यावसायिक संकल्पना समजून घेण्यास आलो आहोत एव्हडी सुरवात केली. त्यांना त्याची व्यावसयिक जडण घडण, व्यावसायिक नीतीमूल्यांचे काटेकोर पालन आणि कामगारांचे स्वातंत्र्य यावर अतिशय परखड विचार ऐकवले. त्यांच्या व्यवसायाला नैतिक अधिष्ठान देणारी इन्कम टॅक्स संदर्भात एक घटना पण त्यांनी प्रांजळपणे ऐकवली.
“मी काही धुतल्या तांदुळासारखा नव्हतो पण या घटनेने मला विचार करण्यास प्रवृत्त केले. आणि प्रामाणिकपणे व्यवसाय करावयाचे मी ठरवले. प्रामाणिकपणा मी प्रथम माझ्यावर लादला आणि मग सोनी आणि टोयोटा या कंपन्यांच्या प्रवर्तकांनी या विचारांना बळ दिले. विवेकानंदांनी मार्ग दाखवला. चला आमचा कारखाना बघू यात.” असे म्हणून ते स्वत: आम्हाला घेऊन त्यांचा कारखाना दाखवू लागले. जाता जाता अनेक गोष्टी समजून सांगत.
“ मी आमच्या कारखान्यास बिझिनेस आश्रम म्हणतो. येथे प्रत्येकाने आपले व्यावसायिक नीती समजावून घेतली पाहिजे आणि त्याप्रमाणे वर्तन केले पाहिजे यावर आमचा कटाक्ष आहे. आमच्याकडे कोणत्याही कामगारास कंपनीचे बॅलन्सशीट / नफातोटा बघण्याचा अधिकार आहे. प्रत्येक कामगारास मिळणारा इन्सेन्टिव्ह हा त्याने केलेल्या कामावर मिळतो. आमच्याकडे वेगळे क्वालीटी सेक्शन नाही. प्रत्येकाने आपल्या कामाची जबाबदारी घेतली तर या सेक्शनची गरज नाही. गेली अनेक वर्षे आमच्या उत्पादनात १०० टक्के अचूकता आम्ही सातत्याने जोपासली आहे.  आमचे कामगार अपवादात्मक परिस्थितीत रजा घेतात.  तर येथे सर्वजण समान आहेत माझे कामगार जे जेवतात तेच मी जेवतो. कँटीनमध्ये त्यांच्याबरोबरच जेवण घेतो. माझ्या केबिन मध्ये कोणासही प्रवेश असतो. येथील पुस्तके वाचू शकतो. मला प्रश्न विचारू शकतो. बाहेरील पाहुणे, सरकारी अधिकारी यांचा पण अपवाद नाही. कोणत्याही कस्टमरला फेव्हर करत नाही. आम्ही कोणालाही लाच देत नाही. पूर्वी येणाऱ्या प्रत्येक सरकारी अधिकाऱ्यास आम्ही पैसे देत नाही असे सांगावे लागे. आता परिस्थिती बदलली आहे सरकारी अधिकारी येतात त्यांचे अकौंट तपासणीचे काम करतात त्याचा रिपोर्ट देतात काही त्रूटी आढळल्यास आम्ही त्यावरील दंड भरतो (अशी वेळ बहुदा येतच नाही) पण आम्हाला पैसे मागण्याची हिम्मत होत नाही. त्यांना कोणतीही स्पेशल ट्रीटमेंट दिली जात नाही. त्यांना हवे असणारे रेकॉर्ड  दिले जाते. मदतनीस दिला जात नाही. माझे सरकारी काम झाले नाही तर १ महिन्याने आम्ही  त्यांना काम न होण्यामागचे कारण लेखी विचारतो. आमच्या मागणीतील त्रूटी सांगा अशी विनंती करतो. तर काही न देताघेता काम होते. या जागेला आम्ही बिझिनेस आश्रम म्हणतो त्यामुळे प्रत्येकजण वस्तूचे पावित्र्य जपण्याचा प्रयत्न करतो. आमचा कामगार आणि स्टाफ यांना मी न सांगता वयक्तिक जीवनात हीच तत्वे पाळतो हे विशेष. साध्या इथे १०० सीएनसी मशीन आहेत. या कारखान्यातील प्रत्येक मशीन बँकेचे कर्ज न घेता आणलेले आहेत. आम्हास आत्ता पण  एक रुपयांचे कर्ज नाही. आम्ही सर्वांसाठी हे ध्यानमंदिर उभे केले आहे. मी स्वत: पहाटे ५ वाजता येथे ध्यान करतो. कोणासही काम करताना ताण आला तर येथे येऊन ध्यान करण्याची मुभा आहे परवानगीची गरज नाही. मन शांत झाले की कामगार परत उत्साहाने कामास लागतात. ”
“आमच्या कडे ओव्हर टाईमची जरुरी नाही. वेळेत येणे जसे बंधनकारक आहे तसेच घरी जाणे. मी स्वत: हे कटाक्षाने पाळतो. मी इथून बाहेर गेलो की एकल स्कूल चे काम करतो. या संस्थेचे कर्नाटक विभागाचे कार्य मी बघतो. अनेक गरीब आणि वंचित मुलामुलींना या संस्थेतर्फे शिक्षण दिले जाते यासाठी सरकारी मदत घेतली जात नाही. सर्व काम स्वयंसेवक करतात. पहिली ते सातवीचे मोफत शिक्षण दिले जाते. प्रत्येक माणसाने आपला वेळ समाजासाठी दिला पाहिजे.”
सर्व कारखाना दाखवून झाला. जेवणाची वेळ झाली. कँटीनमध्ये सर्वांच्या बरोबर त्यांनी जेवण घेतले. आता त्यांच्या कार्यालयात बसलो. जे पाहिले ते अद्भूत होते.
आता विचारण्याची वेळ आली होती.
मी सरळ विचारले “आता आमच्या येण्याचा उद्देश सांगतो आम्ही आमच्या शिक्षकांच्या नावाने देण्यात येणारा “अनुकरणीय उद्योजक” पुरस्कार आपल्याला देण्याचे ठरवले आहे. तुमची सम्मती हवी आहे.” ते क्षणभर विचारात पडले.
“ मी पुरस्कार घेत नसतो हो! ”
“ आमच्या सरंची तत्वे जगणारी मानसे आम्ही शोधतो आणि पुरस्कार देणे हे गौण आहे. पण तुमच्या सारखी अनुकरणीय उदाहरणे लोकांपुढे आली पाहिजेत. विचार कराच नव्हे हो म्हणाच” मी.
त्यांनी ३-४ मिनिटे विचार केला आणि एकदम विचारले
“पुरस्कार कोणाच्या हस्ते देणार”...सुरेशजी
“ग्राहक पंचायतीचे बिंदुमाधव जोशी”...मी
“राजकारणातले कोणी नाही ना?”... सुरेशजी
“छे, आमच्या ट्रस्टमध्ये राजकारणातले कोणीही नाही सरांचे विद्यार्थी आणि कुटुंबीय”...मी
“मग माझा होकार आहे”
आम्ही अवाक झालो. आनंद झाला.
पुढे फेब्रुवारी २०११ मध्ये पुरस्कार वितरण सोहळा झाला. सुरेशजींनी जे मनोगत केले ते व्यावसायिकांसाठी वस्तुपाठच होता. त्यांना दिलेल्या पुरस्काराने कार्यक्रमास वेगळीच उंची मिळाली. या वर्षात देशात सर्वत्र अण्णा हजारेंचे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन चालले होते. त्यामुळे सुरेशजींच्या विचारांनी उपस्थित भारावून गेले.
पुरस्काराची रक्कम त्यांनी एका एकल शाळेस दिली. त्या देणगीस स्वत:चे नाव न देता आमच्या सरांचे नाव दिले केव्हडा मोठेपणा ! तशी रीतसर पावती पाठवली आणि पुढे या शाळेची प्रगती आम्हास कळवत.
एक व्यावसयिक आश्चर्य ठरलेले सुरेश हुंदरे हे पुढच्या पिढीस दीपस्तंभ ठरावेत. He was inspiring wonder.
Thanks to,
श्रीकांत कुलकर्णी
९८५००३५०३७
Shrikantkulkarni5557@gmail.com

Monday, 18 May 2015

कविता

सुरेश भट यांच्या दोन ओळी घेऊन एक पर्यावरणवादी कविता होईल असे मला वाटले ,
 …

original सुरेश भट

कुठे झाडे,कुठे पक्षी ,कुठे तेथे झरे आता
जिथे भेटायचो आपण तेथे आली घरे आता .



राजेश addition

तुझ्या वस्त्रांसम होती गर्द राई जिथे
आता राख वैराण नजर जाई जिथे
तुझे नि माझे ते स्वप्न मखमाली सरे आता
जिथे भेटायचो आपण तेथे आली घरे आता

तोडिल्या वेली,तोडली झाडे,काष्ठ नाम याला
फोडिला डोंगर,पत्थर विकून झाला
वनश्रीमंतवासी होता ,नागवा ठरे आता
जिथे भेटायचो आपण तेथे आली घरे आता

कसला विकास कसली हि राज-नीती
धनदांडगे नि पुढारी अशी हि अभद्र युती
बांधली खुराडी,मानवता गुदमरे आता
जिथे भेटायचो आपण तेथे आली घरे आता

एकीकडे असा  हा धन उर्जा विध्वंस दिसे
दुसरीकडे परंतु पिण्यास पाणी नसे
अपराधी, घे पोटात आम्हा धरे आता
जिथे भेटायचो आपण तेथे आली घरे आता

Inspiration : मातीवरती पाण्याची शेती, समीर कर्वे,maharashtratimes 18.05.2015

समीर कर्वे
आयआयटीशिक्षित तज्ज्ञ डॉ. बिप्लब पटनाईक यांनी १५ वर्षांच्या परिश्रमांनी पाण्याच्या पुनर्वापराच्या जैविक व पर्यावरणसुसंगत पद्धतीवर संशोधन केले आहे. 'सॉइल बायोटेक्नॉलॉजी' (मातीवर आधारित जैविक प्रक्रिया तंत्रज्ञान) असे या तंत्राचे नाव असून, महाराष्ट्रात सध्या पाण्याची समस्या गंभीर बनत चालली असताना मातीवरची ही पाण्याची शेती त्यावर दिलासा ठरू शकते.

पाण्याची शेती करणे शक्य आहे का? निसर्गातील टाकाऊतून टिकाऊ तयार करण्याच्या प्रक्रियेत जर आपण पाणी तयार करू शकलो तर? गाड्या धुण्यापासून बागकामाच्या उपयोगासाठी शहरांमध्ये भरपूर पैसे खर्च करून प्रक्रिया केलेले शुद्ध पाणी वापरले जाते, याबद्दल आपण हळहळ व्यक्त करतो. परंतु, या कामासाठी पर्यायी पाणी आणायचे तरी कुठून, असा रास्त प्रश्न आपल्याला पडतो. आयआयटीशिक्षित तज्ज्ञ डॉ. बिप्लब पटनाईक यांनी गेल्या १५ वर्षांच्या परिश्रमांनी पाण्याच्या पुनर्वापराच्या जैविक व पर्यावरणसुसंगत पद्धतीवर संशोधन केले आहे. त्यांचे हे संशोधन अमेरिकन व भारतीय पेटंटनाही पात्र ठरले आहे. महाराष्ट्रात सध्या प्रत्येक ठिकाणी पाण्याची समस्या गंभीर बनत चालली असताना टाकाऊ पाण्याच्या पुनर्वापराच्या अशा निसर्गनियमावर आधारित शास्त्रीय प्रक्रिया पाणीटंचाईच्या प्रश्नावर दिलासा ठरू शकतात.

वाडा तालुक्यात कोहोज किल्ल्याच्या पायथ्याशी वसविण्यात आलेल्या गोवर्धन ग्रामसंकुलात या मलप्रक्रिया केंद्राचा दाखला आम्हाला पहायला मिळाला. निसर्गातील जैवविविधता व अन्नसाखळी जपून माणसांसाठी सुयोग्य अन्न, निवास आणि निवारा तयार करता येतो, या तत्त्वार बेतलेल्या या प्रकल्पात सांडपाणी व मलनिःस्सारणाची जैविक प्रक्रिया करण्यावर भर होता व त्यातूनच दररोज ३० हजार लिटर्स मल व सांडपाण्याची जैविक प्रक्रिया करण्याची क्षमता असलेला प्रकल्प येथे उभारण्यात आला. सॉइल बायोटेक्नॉलॉजी म्हणजेच मातीवर आधारित जैविक प्रक्रिया तंत्रज्ञान असे या तंत्राचे नाव असून, प्रथम आयआयटीच्या प्रयोगशाळेत जन्मलेले हे तंत्रज्ञान आता प्रत्यक्ष वापरातही उपयुक्तता सिद्ध करीत आहे.

वर म्हटल्याप्रमाणे पाणी वाचवायचे किंवा सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करायची, असे वारंवार म्हटले जाते. परंतु, फार थोड्या शहरांमध्ये त्याचे व्यापक प्रमाणात यशस्वी निकाल मिळतात. कानपूरमधून बी.टेक करून आलेले बिप्लब पटनाईक हे जेव्हा आयआयटी, मुंबईमध्ये पीएचडी करीत होते, तेव्हा त्यांनाही हीच अगतिकता जाणवत होती. त्यांच्या कारखान्यांना अभ्यासभेटी व्हायच्या, तेव्हा तेथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रे कुचकामी ठरल्याची व केवळ कागदावरचा उपचार उरल्याची सल त्यांना बोचू लागली. बरेचसे तंत्रज्ञान पुस्तकात शोभून दिसते, मात्र प्रत्यक्षात ते काम करीत नाही, असे त्यांच्या लक्षात आले. आयआयटीमध्ये आल्यावर त्यांचे वरिष्ठ पीएचडी फेलो डॉ. उदय भवाळकर त्यावेळी घनरूप मलनिःस्सारण प्रक्रिया, व्हर्मिकल्चर यावर काम करीत होते व अशा एखाद्या समस्येवर चिरस्थायी विकासास पूरक असे उत्तर शोधावे, याची प्रेरणा त्यांनीच बिप्लब यांना दिली.

यातूनच बिप्लब यांचे संशोधन सुरू झाले. सुरुवातीस ते प्रयोगशाळेत होते. परंतु, या प्रयोगांची व्यवहार्यता तपासणे गरजेचे होते. प्रयोगशाळेतील प्रयोगात बिप्लब यांनी एक महत्त्वाचा बदल आपल्या दृष्टीत ठेवला. तो म्हणजे सांडपाण्यावर किंवा मलावर प्रक्रिया करायची, तर ती पाण्यातच होते, हा सर्वसाधारण पाया त्यांनी मोडीत काढला. बिप्लब म्हणाले, मुळात पाण्यामध्ये प्राणवायूचे प्रमाण कमी असते. त्यामुळे त्यात मलावर प्रक्रिया करायची झाली, तर त्यात ऑक्सिजन सोडायला हवा. शिवाय आपल्या महापालिका ज्या प्रकारे मलनिःस्सारण प्रक्रिया करतात, त्यात हे मल अनेक किलोमीटरवर जमिनीखालून वाहून नेले जाते. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे वायू तयार होतात. मल बरेच अंतर वाहून केंद्र‌भिूत पद्धतीने त्यावर प्रक्रिया करायची, तर या प्रक्रियेतून मिळालेले पाणी वापरणारे ग्राहक पुन्हा लांब अंतरावर असतात. म्हणजे त्याचाही उपयोग होत नाही. मोठ्या प्रमाणात मल कोंडल्यामुळे त्यातून प्रदूषित किंवा विषारी वायू मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात. ते आरोग्य व पर्यावरणास घातक असतात. कित्येकदा परदेशातील मॉडेलचे अंधानुकरण केले जाते. परदेशातले तापमान मुळातच कमी असते. भारतातील तापमानात तीच व्यवस्था कुचकामी ठरते. अमोनियासारखे वायू भारतात तयार झाल्यास येथील तापमानामुळे त्यांच्या ज्वलनशीलतेचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळेच सांडपाणी, मल यांच्या उगमाजवळच विकेंद्रित पद्धतीने त्यावर प्रक्रिया करावी, हा मुख्य उद्देश एसबीटी प्रक्रियेत ठेवण्यात आला. मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये काही सोसायट्यांमध्ये जिथे पुनर्प्रक्रिया केलेले पाणी वापरात येते, त्यात इतरही त्रुटी दिसल्या होत्या. बऱ्याचशा प्रकल्पांमधले पाणी टॉयलेट फ्लशिंगसाठी वापरल्यावर एक दुर्गंधी येते. शिवाय प्रकल्प चालविण्याचा खर्च अवाढव्य असतो. खूप वीज खर्च होते वा रसायने भरपूर लागतात, अशाही तक्रारी होत्या. या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यास एसबीटीमध्ये प्राधान्य होते. या प्रक्रियेची प्रत्यक्ष चाचणी घेण्याची संधी आम्हाला गोरेगावच्या इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट अॅण्ड रिसर्च या संस्थेच्या संकुलात मिळाली. तेथे आम्ही प्रथम २५ हजार लिटर्सचा प्रकल्प सुरू केला.

माती, पंप, यासारखे अडगळीतले सामान असलेली प्रयोगशाळा फारशी कुणाला आकर्षक वाटणार नाही. परंतु, आयआयटीभेटीमध्ये डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या नजरेने ही प्रयोगशाळा हेरली व त्यांनी बिप्लब यांच्याकडून त्याविषयी माहिती घेतली. त्यांना या तंत्रज्ञानाच्या पेटंटसाठी अर्ज करण्यास प्रवृत्त केले. त्यानुसार सर्व शास्त्रीय लेखन करून पेटंटसाठी अर्ज केला तेव्हा दोन अमेरिकन व दोन भारतीय पेटंट त्यांना मिळाली. मातीतील म्हणजेच निसर्गाच्या अन्नसाखळीतील भक्ष्य व भक्षक या घटकांचाच पाणी स्वच्छ करण्यासाठी वापर करणे, हे यातले मुख्य तंत्र होते. त्यात प्रादेशिक जैवतंत्रज्ञान, मातीचे जीवशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, भूरसायनशास्त्र, भूपदार्थविज्ञान व रासायनिक अभियांत्रिकीची तत्त्व असे विविध शाखांचे एकत्रित ज्ञान वापरल्यामुळे ते पेटंटला पात्र ठरले.

मृत जीवजंतूंना सामावून घेण्यासाठी माती ही उत्तम नैसर्गिक घटक म्हणून काम करते. टाकाऊ पाण्यातील जीवजंतू अलग करण्यासाठी मातीचा सुयोग्य वापर व्हायला हवा. हिरवी झाडे, झुडपे यांच्यातही पाण्यातून जीवजंतू शोषण्याची चांगली क्षमता असते. तिचा वापर व्हायला हवा. मातीत निसर्गतःच प्राणवायूचा पुरवठा असतो, जो मातीत खेळत्या हवेची प्रक्रिया करण्यास उपकारक ठरतो. खेळत्या हवेमुळे या प्रक्रियेतून अनावश्यक विषारी किंवा ग्रीनहाऊस वायू उत्सर्जित होत नाहीत. साहजिकच दुर्गंधी किंवा विषारी वायूंचे प्रदूषण होत नाही. याचे प्रत्यंतर गोवर्धन गावात आले. तेथे ३० हजार लिटर्सचा एसबीटी प्रकल्प बिप्लब यांच्या लाइफलिंक इको टेक्नॉलॉजिसने उभारला. इस्कॉनच्या या प्रकल्पातही आयआयटी, बेंगळुरूचे आयआयएससी अशा नामांकित विज्ञान-तंत्रज्ञान जगतातून आलेले शास्त्रज्ञ आता 'शून्य कचरा' आधारित गाव तयार करण्याच्या कामात लागले आहेत. त्यामुळे एसबीटीला येथे चांगला वाव होता. स्वयंपाकाचा कचरा, टॉयलेट-बाथरूम यांच्या वापरातून येथे तयार होणारा मल व सांडपाणी एका टाक्यात आणून ते सौरऊर्जेच्या पंपानेच दहा फूट वर चढविले जाते. तेथे मातीच्या साह्याने नैसर्गिक प्रक्रिया सुरू राहते. अत्यंत कमी जागा व्यापणाऱ्या या गच्चीवर अत्यंत डेरेदार वृक्ष फुलले आहेत. लालचुटुक गुलाब, गलेलठ्ठ पपया यांची दाटीवाटी येथे आहे. येथून बाहेर पडणारे जवळपास ९० ते ९५ टक्के पाणी पुन्हा बागकामासाठी वापरले जाते. त्यावर फळभाज्यांची लागवड करण्यात आली आहे. २० लाखांच्या भांडवलात ३० हजार किलोलीटर्स क्षमतेचा प्रकल्प साकारला असला, तरी आज तो ६० हजार लिटर क्षमतेने काम करीत आहे. आता तीच क्षमता दुप्पट करण्याची योजना आहे. ३० हजार लिटरचा प्रकल्प साधारण ३० कुटुंबे किंवा १५० माणसांच्या संकुलास उपयुक्त ठरतो. यातून शून्य उत्सर्जन होतेच, शिवाय सुंदर मनोहारी बगिचाही उपलब्ध होतो. हॉटेल्स, गोल्फक्लब, संरक्षण आस्थापना, निवासी, उद्योग व व्यापारसंकुले येथे हे तंत्रज्ञान उपयुक्त असल्याचे आढळले आहे. १५ वर्षात एसबीटीमध्ये जागेचा वापर कमी करण्यापासून अनेक सुधारणांवर भर आहे.

पाणीटंचाईच्या मुकाबल्यासाठी आपल्याला अशाच कमी खर्चिक, जैविक व चिरस्थायी प्रकल्पांतून पाण्याची पुनर्प्रक्रिया गरजेची ठरणार आहे. जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माणासारख्या योजनांमध्ये मलनिःस्सारण, सांडपाणी व्यवस्थापन यासाठी निधी येत असतो. पालिकाही रेनवॉटर हार्वेस्टिंग, जलसंवर्धन योजनांसाठी करसवलती देतात. एसबीटीसारखे विकेंद्रित स्वरूपाचे प्रकल्प अधिकाधिक रूपात आल्यास या योजनांमधील पैसा खऱ्या अर्थाने वापरला गेल्यासारखे होईल. महापालिकांच्या आर्थिक डोलाऱ्यात मलनिःस्सारण, पाणी व्यवस्थापन यावरील हजारो कोटी रुपयांच्या निधीला शिस्त लावायची झाल्यास असे विकेंद्रित प्रकल्प यापुढे गरजेचे राहतील. स्मार्ट शहरांच्या निर्मितीसाठी केवळ निधी नव्हे, तर ही इच्छाशक्ती गरजेची आहे.

Sunday, 17 May 2015

Inspiration : Soil Biotechnology plant at Govardhan Eco Village



Having discussed the drawbacks of modern day sewage systems, in the last article we saw how water based sewage systems offer the advantage of easier sewage transportation, while soil based treatment systems offer effective sewage processing. Blending the advantages of both, the sewage at Govardhan Eco Village is effectively taken care of by the Soil BioTechnology plant (SBT).
SBT system consists of an impervious containment and incorporates soil, formulated granular filter media, select culture of macro organisms such as earthworms and plants. It involves a combination of physical and biological process for processing of wastewater and it derives its fundamental principle from the functioning of a terrestrial ecosystem. The process by design integrates with the natural bio-geochemical cycles of nature and hence proves to be most effective.
The combined grey and black water from all the residential facilities are collected and transported via a water based underground sewerage network to a central collection point. In the first stage the physical separation of waste is accomplished in a primary treatment unit consisting of an perforated screen and gravity-settling tank and an equalization tank. The perforated screen helps in separating the undissolved solid wastes from the waste water and allows it to pass through a settling chamber that has a sloped bottom opposite to the direction of the water flow, thus facilitating the settling of solid particulates with higher specific gravity than the waste stream. Then the water enters the open top equalization tank that allows the dissolved pollutants to be exposed to natural sterilization by sunlight and ambient air.
In this second stage the wastewater is sprayed, by means of a pump, onto a plant bed which is part of an engineered ecosystem that constitutes two bio-reactors, one for a coarse purification and the other for further refining through recycling. This ecosystem consisting of soil, bacterial culture and earthworms, mineral additives and select plants, treats the water is a combination of physio-chemical and biological processes. Purification takes place by adsorption, filtration and biological reaction. The entire waste is processed and converted into bio-fertilizer which is rich in organic content, and is being used in the plant nursery at GEV. The other useful by-product is the Biomass in the form of flower, fodder, fruit and fiber which are also completely utilized in house. Since the entire waste is converted, there are no issues like handling the wastes after treating the water, as is common in conventional chemical based sewage treatment plants. The entire process operates in aerobic mode thus eliminating the possibility of foul odor near the plant, creating a safe and serene ambiance for the people dwelling near the plant. The processed water can be reused in gardening, agriculture and also support marine life.
The SBT plant at GEV can handle up to 30,000 litres of sewage per day and operates in an 8 hour cycle daily. It can potentially produce up to 20,00,000 Tons of bio-fertilizer per year and most importantly offers an eco-friendly option to the growing menace of waste handling. If you would like to implement this technology in your village, locality, home or would like to know more about this system feel free to mail us at contactus@ecovillage.org.in

Wednesday, 13 May 2015

मन


   मन

--- मेघा देशपांडे

मन वाभरं वाभरं
देहा हातून फरार
किती बांधू दावणीला
स्थिर नाही घडीभर

देह श्रोत्यात बसला
मन आत बडबडे
ऐकू कुणाचे कळेना
दोघे घालती साकडे

मना हरणाचे पाय
देह हातावर घडी
आज्ञा अन अवज्ञेची
आत चाले रेटारेटी

देह समजूतदार
बंद ठेवी सारी दारं
मन मांजर चोरटी
मनातल्या लोण्यावर

देह शिक्षित शहाणा
मन यड खुळं बेणं
देह हसे दुसऱ्याला
मन हसे स्वतःवर

देह चुलीपाशी रत
मन फिरे रानोमाळ
देही हिशेब नेटका
मनी कवितेची ओळ

देह टापटीप घडी
मन द्रौपदीचं वस्त्र
देहा लाज अतोनात
मन दत्त दिगंबर

देह घर आवरत
मन आवरतं विश्व
देह कार्यशील मग्न
मन आठवांत रत

देह जागच्या जागी
मन दूर दूर झरे
देह दिनचर्या घडी
मन वेल्हाळ पसरे

देह पाही याची डोळा
मना अलौकिक दृष्टी
देह पाही पान फूल
मनी मंतरली सृष्टी

देह संसार टुकीचा
मन पसारा अमाप
देह कपाटाचे दार
मन चोरखण आत.

देह जाचतो टाचतो
मन मखमल मऊ
देह वचक दरारा
मन म्हणे नको भिऊ

देह जड जड भिंत
मन झिरपती ओल
देह रंग सजावट
मन गहराई खोल.

देह मन देह मन
जरी तळ्यात मळ्यात
देहा मनाचे अद्वैत
भरी घडा काठोकाठ.
- मेघा देशपांडे.

Rajesh addition

देह खचे कधीकधी
मन उमंग उमंग
देह आहे जणु देहू
मन अभंग अभंग

देह असे जडशीळ
मन तरंगते पीस
देह पेंगुळते झोप
मन जागे रातंदिस

देह राबतो उन्हात
मन असे अंधारात
नसे देहाच्या हातात
काय  मनाच्या मनात

Friday, 8 May 2015

Inspiration : प्रकाश अंबुरेंचा अनोखा प्रवास फणस, कंदील ते स्टेंट, विनायक परब.


विनायक परब - response.lokprabha@expressindia.com
Published: Friday, May 15, 2015

कमी मार्क मिळाले म्हणून निराश होणाऱ्या, आयुष्यात आता काही उरले नाही असा विचार करणाऱ्यांनी प्रकाश अंबुरेंचे विलक्षण असे व्यावसायिक करिअर समजून घेतले तर निराशा त्यांच्या आसपासही फिरकणार नाही..
''शाळेत तुम्ही किती गुण मिळवलेत हे नंतर उभ्या आयुष्यात तुम्हाला कुणीही विचारत नाही. त्यातही तुम्ही यशस्वी झालेले असाल, तर मग प्रश्नच येत नाही. त्यामुळे शाळेत कमी मार्क मिळाले म्हणून आशावाद हरवून बसू नका. शाळेतले मार्क म्हणजे अंतिम सत्य नाही. माझ्या अनुभवातून मी हे सांगतो आहे. शाळेत असतानाचे माझे मार्क नेहमी जेमतेम किंवा सर्वसाधारणच असायचे; पण आयुष्याच्या परीक्षेत मात्र आज माझी गणना यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये होते. मी आज यशस्वी उद्योजक आहे. केवळ आपल्यात राज्यात नाही, तर परराज्यात म्हणजे थेट राजस्थानात जाऊन मी माझ्या यशाची गुढी उभारली, ज्याचा अभिमान समस्त महाराष्ट्रीयांना वाटावा.. जबरदस्त निरीक्षणशक्ती, मेहनत घेण्याची तयारी, संयम आणि प्रयत्नांमध्ये सातत्य व आपण यशस्वी होणारच या स्वत:च्या धारणेवर श्रद्धा असेल, तर यश नक्कीच तुमचे आहे!''
राजस्थानातील यशस्वी उद्योजक असलेले अस्सल मराठमोळे नाव म्हणजे प्रकाश अंबुरे. राजस्थानातील दगडखाणींचे मालक, त्याच्याशी संबंधित उद्योगातील यशस्वी उद्योजक आणि हृदयशस्त्रक्रियेत लागणाऱ्या स्टेंटच्या अत्याधुनिक व्यवसायामध्ये पदार्पण करण्याच्या बेतात असणारे अंबुरे 'लोकप्रभा' करिअर विशेषांकाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांशी संवाद साधतात.. गेल्या काही वर्षांमध्ये शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्याने व्यथित झालेले अंबुरे म्हणतात, आयुष्य शाळा-महाविद्यालयापेक्षाही खूप मोठे आहे. आपल्या कर्तृत्व सिद्ध करण्याच्या अनेक संधी नंतरही आयुष्यात येतात, यावर विश्वास ठेवा आणि वाटचाल करा.
मुंबईत गिरगावातील झावबाच्या वाडीत असलेल्या दिव्याची चाळीमध्ये अंबुरेंचे बालपण एकत्र कुटुंबामध्ये गेले. वडिलांनी नोकरी सोडली आणि ते शेती करण्यासाठी कोकणात गेले. अंबुरे मग सुरुवातीला भांडुपला, तर नंतर बोरिवलीला असे काकांसोबत राहिले. आज आपण जे काही आहोत, त्यात काका-काकींचे योगदान खूप मोठे असल्याचे ते मान्य करतात. काका-काकूंना मूल झाल्यानंतरही त्यांची माया आटली नाही किंवा मुलांमध्ये असलेला अग्रक्रम बदलला नाही. कुटुंबाची ही साथ नंतरही खूप महत्त्वाची ठरली. यशस्वी उद्योजकाला कुटुंबाची साथ तेवढीच महत्त्वाची असते, अंबुरे नमूद करतात.
नववीला बोरिवलीत श्रीकृष्ण नगरातील चोगले शाळेत असतानाच प्रथम पैशांचे महत्त्व कळले, ज्या वेळेस आर्थिक अडचण निर्माण झाली. मग शाळेत असतानाच कंदील विकणे, फटाके विक्री करणे सुरू झाले. वटपौर्णिमेच्या वेळेस फणस, आंबे विकले, असे अनेक अनुभव अंबुरे सांगतात. ती आपल्यातील उद्योजकाची सुरुवात होती, असे आज लक्षात येते. शाळेतील शिक्षक आणि मित्रांनीही चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे आत्मविश्वास वाढला.
अकरावी-बारावीत असताना अर्धवेळ कामही केले, कारण त्याशिवाय महाविद्यालयात शिकणे परवडणारे नव्हते. निराला मोटार ट्रेनिंग स्कूलमध्ये नोकरी केली. तरीही भागेना. अखेरीस बारावी अर्धवट सोडावी लागली. मग जाहिरात वाचून 'डाका सिरॅमिक्स अ‍ॅण्ड केमप्लास्ट प्रायव्हेट लिमिटेड' या फर्नेस मटेरियलचे काम करणाऱ्या कंपनीमध्ये दाखल झालो. उरणला प्रशिक्षण झाले आणि सुपरवायजर म्हणून कामाला सुरुवात केली. या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक होत्या प्रसिद्ध वैज्ञानिक अलमेत्रा पटेल. अचानक उत्पादन वाढविण्याची गरज निर्माण झाली. त्या वेळेस शिफ्ट्स वाढवून उत्पादन वाढविता येईल, असे अंबुरेंनी सांगितले. जबाबदारी घेतली आणि यशस्वीरीत्या पारही पाडून दाखवली. ५० टनांचे उत्पादन थेट २५० टनांपर्यंत वाढवत नेले. दरम्यानच्या काळात आर. जे. मेहता यांची युनियन कंपनीत दाखल झाली आणि मग प्रकरण संपापर्यंत गेले. कंपनी बंद पडली, पण तोपर्यंत अंबुरे यांनी उत्पादन ३१० टनांपर्यंत नेले होते. हे सारे सुरू असताना हिलेल जुडा हे कंपनीचे व्यवस्थापक होते. शिवाय परमेश्वरन नावाचे एक सहअधिकारीही होते. जुडा आजही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
कंपनी बंद पडल्यानंतर अश्रू गाळत न बसता अंबुरे यांनीच पुढाकार घेतला आणि जुडा व परमेश्वरन यांना प्रश्न केला की, आपण राजस्थानवरून कच्चा माल घेऊन याच तंत्रावर नवीन फॅक्टरी चालवायची का? अंबुरे म्हणतात, आजही आठवते, ठाण्याला तलावपाळीला एक तांबे हॉटेल होते, तिथे बसून आम्ही ही चर्चा केली होती. मॅन्युफॅक्चिरग आवडायचे आणि ते आपल्याला जमतेही आहे, हे तोपर्यंत लक्षात आले होते. स्टील किंवा कोणत्याही धातूसाठी लायनिंग मटेरिएल म्हणून वापरल्या जाणाऱ्या दगडाची भुकटी करण्याचे हे काम होते. प्रश्न असा होता की, परप्रांतात म्हणजे राजस्थानला कोण जाणार?
उद्योजक व्हायचे तर नवीन प्रांत धुंडाळावे लागतात आणि धोकेही पत्करावे लागतात. नवीन आव्हाने स्वीकारल्याशिवाय मोठे होता येत नाही. उद्योगाची कल्पना मनात आली त्याच वेळेस ठरवले होते की, लागेल ते आपणच करायचे, प्रकाश अंबुरे सांगत होते. मग जुडा, परमेश्वरन यांनी नातेवाईक मित्रांकडून पैसे गोळा केले. मी काकांना सांगितले, काका- काकी दोघेही पाठीशी ठाम उभे राहिले. काकीने तिचे दागिने गहाण टाकले. राजस्थान गाठले, ज्यांच्याकडून कच्चा माल घ्यायचा त्यांच्याशी पाच वर्षांचा करार केला. जे आपल्याकडे नाही ते बाहेरून घ्यायचे ठरवले. सुरुवातीला केवळ दोनच कामगार होते. त्याचे नंतर एक एक करत ३० कामगार झाले. पहिली फॅक्टरी 'जे. पी. मिनरल' अशा प्रकारे सुरू झाली. या सर्व कालखंडात बायको छाया पूर्णपणे पाठीशी उभी राहिली. नुकतेच लग्न झाले होते, पण तिने कोणतीही कुरकुर केली नाही.
दरम्यानच्या काळात कच्च्या मालाची गुणवत्ता घसरू लागली आणि असे लक्षात आले की, उत्पादनाची गुणवत्ता घसरू द्यायची नसेल, तर खाणीतून येणारा माल आपलाच असला पाहिजे. तरच आपल्याला त्यावर नियंत्रण ठेवता येईल. प्रकाश अंबुरे पुढे सांगतात, हे लक्षात आल्यानंतर मी खाण व्यवसायात उतरलो. चार खाणी घेतल्या, त्यामुळे मग आता खाणींतून येणारा कच्चा माल चांगला मिळू लागला, कारण खाणी स्वत:च्या होत्या.
मी खरे तर कोकणातून आलो आहे. त्यामुळे मला शेतीची आवड आहे. आताशा शेती फारशी फायदेशीर राहिलेली नाही, असा तक्रारीचा सूर ऐकायला मिळतो. त्याला मला यशस्वी छेद द्यायचा आहे. मी त्यासाठीचा शोधही पूर्णत्वास आणला आहे.
अनेकांना वाटते की, व्यवसाय-उद्योगामध्ये आपण स्थिरावलो की काम झाले. मग आयुष्यभर काही पाहायला नको, पण उद्योगात असे कधीच होत नाही. काळाप्रमाणे बदलावे लागते. कायमस्वरूपी असे काहीच नसते. खाण उद्योगात काळाबाजार वाढला, राजकीय व पोलिसी हस्तक्षेप वाढला, त्या वेळेस लक्षात आले की, आपल्याला आता काही तरी वेगळे करावे लागणार. मग त्या वेळेस हळूहळू आवरते घेण्यास सुरुवात केली. आणि ग्राइंडिंगचे काम करणारी 'सरस्वती एन्टरप्रायझेस' ही कंपनी आईच्या नावाने सुरू केली.
दरम्यानच्या काळात आणखी एक नवा उद्योग सुरू केला होता तो होता एचडीपी बॅगचा. या बॅग हा तयार झालेला माल भरण्यासाठी लागायच्या. त्याच्या वाढत्या किमती पाहून मनात आले की, हा उद्योग आपणच का सुरू करू नये. मग माहीतगार माणसे सोबत घेतली आणि प्लास्टिक बॅगचा व्यवसाय सुरू केला. प्रथम आमच्या उद्योगाला लागणाऱ्या बॅगा तयार करायचो आणि मग उरलेल्या बाजारपेठेत विक्री करायचो. हा तोच कालखंड होता की, ज्या वेळेस मुलगाही मोठा झाला. पुण्यात एमआयटीमधून त्याने मेकॅनिकल इंजिनीअिरग पूर्ण केले आणि तोही व्यवसायात उतरण्याच्या बेतात होता. त्यानेही ग्राइंडिंगपासून सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यासोबत मित्र भागीदार म्हणून होते. तिथे या व्यवसायासाठी लागणारी यंत्रणा तयार करण्याचा प्रश्न आला त्या वेळेस अंबुरेंच्या लक्षात आले की, आपण एवढा काळ या व्यवसायात आहोत, की थोडे तांत्रिक ज्ञान कामाला लावले, तर त्याची यंत्रणाच आपण उभी करू शकतो. शिवाय मग त्याची निर्मिती करून ती इतरांनाही विकू शकतो. मग त्यांच्या नेहमीच्या धाटणीने त्यांनी त्यालाही हात घातला आणि तिथेही त्यांना व त्यांचा मुलगा अभिजित याला यश आले.
दरम्यानच्या काळात खाण व्यवसायातून बाहेर पडून काही चांगले करता येईल का याचा शोध घेणाऱ्या प्रकाश अंबुरे यांना लक्षात आले की, आताचा जमाना हा स्वच्छ इंधनाचा आहे. पर्यावरणास अनुकूल असे इंधन हा भविष्याचा मंत्र असणार आहे. शोध घेत अखेरीस ते एका उत्पादनावर स्थिरावले. शेतीमधून तयार होणाऱ्या कचरा कॉम्पॅक्टरमध्ये वापरून त्यापासून ब्रॅकेट व्हाइटकोलची निर्मिती त्यांनी केली. सध्या हा उद्योग उत्तम चालला आहे.
मुलगा अभिजित तोपर्यंत वडिलांच्या मागे लागला होता. अनुभवातून आलेल्या ज्ञानाला तुम्ही शिक्षणाचा पाया द्या, असे त्याचे म्हणणे होते. मग मुलाच्या विनंतीवरून त्यांनी एस. पी. जैन मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट या मुंबईतील प्रख्यात कॉलेजमधून वयाच्या पंचेचाळिशीत एमबीए पूर्ण केले. अंबुरे म्हणतात, या एमबीएमध्ये खूप काही नवीन शिकायला मिळाले. त्यातून आणखी काही नवीन उद्योगाच्या कल्पना मिळाल्या. माझ्यासारखेच नवी कल्पक उद्योजक असलेले मित्र मिळाले. तुम्ही कुणासोबत राहता, वावरता हेही तेवढेच महत्त्वाचे असते. आता अंबुरे यांनी आयुष्यातील एक मोठा टप्पा पार करून हनुमान उडी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
अलीकडच्या काळात हृदयविकाराच्या प्रमाणामध्ये खूप वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक हृदयरुग्णांना अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी करावी लागते. त्यासाठी हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये एक स्टेंट म्हणजेच स्प्रिंग टाकली जाते. रक्तप्रवाहातील अडथळा दूर करण्याचे काम ही स्टेंट करते. या स्टेंटला खूप मागणी आहे. आता या स्टेंटमध्येही अद्ययावतता आली असून काम संपल्यानंतर चक्क विरघळून जाणाऱ्या अशा स्टेंटची निर्मिती करण्याचा विडा उचललेल्या कंपनीने अंबुरे यांची कारकीर्द पाहून त्यांना भागीदार म्हणून सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
अनेकांना वाटते की, व्यवसाय-उद्योगामध्ये आपण स्थिरावलो की काम झाले. मग आयुष्यभर काही पाहायला नको, पण उद्योगात असे कधीच होत नाही. काळाप्रमाणे बदलावे लागते. कायमस्वरूपी असे काहीच नसते.
याशिवायही आणखी काही करणे आता बाकी आहे काय, या प्रश्नावर तेवढय़ाच उत्साहाने अंबुरे म्हणतात, हो तर, बरेच काही बाकी आहे. मी खरे तर कोकणातून आलो आहे. त्यामुळे मला शेतीची आवड आहे. शेती करण्याचे स्वप्न आहे. अर्थात ती मी केलेली शेती असल्याने त्यातही तुम्हाला निश्चितच खूप नावीन्यपूर्ण प्रयोग पाहायला मिळतील. आताशा शेती फारशी फायदेशीर राहिलेली नाही, असा तक्रारीचा सूर ऐकायला मिळतो. त्याला मला यशस्वी छेद द्यायचा आहे. मी त्यासाठीचा शोधही पूर्णत्वास आणला आहे. वनौषधींची निवडही केली आहे. आता पुढच्या काळात मुख्य उद्योगातून बाजूला होत मी शेतीवर लक्ष केंद्रित करणार आहे.
नववीत असताना वटपौर्णिमेला आंबे-फणस, तर दिवाळीत कंदील विक्री करण्यापासून सुरू झालेला हा प्रवास आता हृदयविकारावरील उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या स्टेंटपर्यंत पोहोचला आहे. अंबुरे यांचा प्रवास केवळ कौतुकास्पदच नाही, तर शालेय शिक्षणामध्ये फारशी प्रगती दाखवू न शकलेल्यांसाठी प्रेरणादायी असाच आहे. त्याबाबत प्रकाश अंबुरे म्हणतात, शालेय जीवनातील मार्क म्हणजे अंतिम सत्य नाही हे लक्षात ठेवा. जबरदस्त निरीक्षणशक्ती, मेहनत घेण्याची तयारी, काळाप्रमाणे बदलण्याची मानसिकता आणि कोणत्याही आव्हानांना सामोरे जाण्याची धमक असेल, तर उद्योग क्षेत्रात तुमचे स्वागतच आहे.
राजस्थानसारख्या परक्या प्रदेशात जाऊन स्थिरावणे सोपे नव्हते, कारण तिथे मित्र-नातेवाईक कुणीच नव्हते. भाषा शिकण्यापासून सुरुवात होती. ते सारे आत्मसात केले. आता त्यांना मी त्यांच्यातीलच एक वाटतो.
व्यवसायासाठी म्हणून अनेकदा आपल्या आवडीनिवडीही बाजूला ठेवाव्या लागतात, हेही तरुणाईने लक्षात घेतले पाहिजे, अंबुरे सांगतात. राजस्थानातील या व्यवसायाशी संबंधित बरीच मंडळी ही जैन होती. त्यामुळे त्यांच्याकडे केवळ शाकाहारच केला जायचा. त्यामुळे मीही आता पक्का शाकाहारी झालोय. सुरुवातीला व्यवसायासाठी म्हणून पूर्ण शाकाहार स्वीकारला. आता त्याचे फायदे लक्षात आल्याने आनंदीच आहे.
व्यवसायामध्ये खूपदा अडचणी येतात. एखादी गोष्ट आपल्याला येत नसते आणि नेमकी तीच गरज म्हणून उभी राहते, अशा वेळेस काय करायचे, असा यक्षप्रश्न असतो. मग लोक उगाचच जी गरज आहे ती मुळापासून शिकण्यामध्ये वेळ घालवतात. अशा अडचणी मलाही आल्या, पण मी त्या सर्व गोष्टी स्वत: करण्यात वेळ नाही घालवला, तर त्या गोष्टी येणारी तज्ज्ञ माणसे जोडली. त्यांच्याशी उत्तम संबंध प्रस्थापित केले आणि त्यांनी माझ्याचकडे केलेले काम त्यांच्यावर लक्ष ठेवत असताना शिकूनही घेतले. व्यवसाय-उद्योगात नियोजनाला सर्वाधिक महत्त्व असते. तुम्ही किती शिकला आहात, यापेक्षा तुम्ही शिकलेल्या गोष्टींची अंमलबजावणी कशी करता, याला अधिक महत्त्व असते. तुम्ही किती चांगले नियोजनकार आहात, यावर तुमचे यश अवलंबून असते.
काळाप्रमाणे बदलता येणे हाही उद्योगामधला सर्वात महत्त्वाचा गुणविशेष असतो. तुमच्यामध्ये कामाची लवचीकता असावी लागते. कोणत्याही क्षणी नवीन क्षेत्र समोर उभे ठाकले, तर त्याला सामोरे जाता यायला हवे. सर्वात महत्त्वाचा सोबत असतो तो तुमचा आत्मविश्वास. हा तुम्हाला तुमच्या कामामधून येतो. नववीत विकलेले फणस आणि कंदील यांनी त्याचा पाया रचला. त्याच्याच बळावर आज माझी उद्योगाची इमारत उभी आहे, अंबुरे सांगतात.
विनायक परब