Wednesday, 23 May 2018

प्रयोगशील कांदाशेतीत अोळख मिळवलेले निमोण :ज्ञानेश उगले esakal

Inspirational Story



Thanks to ज्ञानेश उगले and esakal.25 May 2018.

नाही नदी, नाही नाला, नाही खळाळत पाणी
माझ्या गावच्या पाण्याची, आहे रीतच अडाणी...
प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या कवितेतील या अोळी जणू निमोण गावासाठीच आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. खळाळंत पाणी तर दूरच, पण वर्षानुवर्षं पाऊसही या गावावर रुसतो. तरीही गावच्या मातीची उमेदच जगावेगळी आहे. कांदा उत्पादकांचं गाव म्हणून निमोणनं ख्याती निर्माण केलीय. नाशिक जिल्ह्यात चांदवड या दुष्काळी तालुक्‍यातील हे दुष्काळी गाव. पावसाळ्यात जेमतेम पाऊस पडतो. त्यावर कसंबसं तग धरणारं हे गाव.

स्वतःची अोळख तयार केली
प्रतिकूलतेतही उभं राहताना स्वत:ची ओळख निर्माण करताना निमोणचा शेतकरी अत्यंत चांगल्या प्रतीचा कांदा पिकवतो. पिकविल्यानंतरही प्रतवारी करूनच विक्रीला नेणार, ही त्याची ओळख आहे. कुठलीही बारमाही सिंचनाची सोय नसतानाही शेतीत कायम वेगवेगळे प्रयोग करण्याची धडपड त्याच्यात दिसून येते.

कांदा, भाजीपाला आणि पशुपालनही
निमोणची लोकसंख्या सुमारे तीन हजारांपर्यंत
गाव शिवारात सुमारे ३५० कुटुंबे
मुख्य व्यवसाय शेती आणि त्यातही मुख्य पीक कांदा.
हंगाम व पाण्याच्या सोयीनुसार भाजीपाला पिके
एकूण क्षेत्रापैकी तीन हजार एकरांवर कांदा, तर उर्वरित पंधराशे एकरांवर अन्य पिके आहेत.
गावातील प्रत्येक शेतकऱ्याचे सरासरी क्षेत्र ८ एकर. पैकी पाच ते सहा एकरांवर कांदा.
पन्नास टक्के शेतकरी पशुपालन व दुग्धव्यवसाय. त्यातून दूध व शेतीला शेणखत उपलब्ध होते.

 अल्पावधीत कांदा बाजारात
ऑगस्टमध्ये नागपंचमी ते ऑगस्ट अखेरपर्यंत श्रावणसरी असतात. त्या कोसळल्यानंतरच्या गारव्यावरच लागवडीची तयारी केली जाते. त्या आधी सरी वाफे पाडून शेत तयार केलेले असते.

श्रावण महिन्यात अत्यंत कमी पाणी दिले जाते.
तोपर्यंत विहिरींमध्ये पाणीसाठा झालेला असतो. लागवडीपासून
ते काढणीपर्यंत पिकाला कमी पाण्याची सवय ठेवली जाते. जोडीला शेणखताचा चांगला वापर होतो. यामुळे लागवडीपासून सुमारे ८० दिवसांत कांदा सशक्त व काढणीसाठी तयार होत असतो.

बाजाराचा अभ्यास
पोळा सणापूर्वी या कांद्याची लागवड होत असल्याने त्यास पोळकांदा म्हणतात. त्याची हेक्टरी उत्पादकता रब्बी कांद्यापेक्षा कमी असते. ऑक्‍टोबरमध्ये हा कांदा बाजारात येतो. या काळात देशभरात कांद्याची कमतरता असते व त्यामुळे चांगला दर मिळतो. त्यामुळे उत्पादकता कमी असली, तरी त्याचे अर्थकारण बिघडत नाही. बाजारात चढ-उतार नेहमीच असतात. एखाद्या वर्षी तोटा जरी झाला, तरी दर वर्षी निष्ठेने पीक घेण्यात निमोणच्या शेतकऱ्यांचा हातखंडा आहे. मग काही वर्षे नफ्याचीही मिळतात.

चार महिने जमिनीला विश्रांती
जून ते नोव्हेंबर या काळात कांदापिकात आकंठ बुडालेला निमोणचा शेतकरी डिसेंबर ते मार्च या काळात मात्र फारसे कोणते पीक घेत नाही. पाणी नसल्यामुळे ते शक्‍यही होत नाही. या काळात जमिनीला विश्रांती मिळते. एप्रिलनंतर हा शेतकरी पुढील हंगामाच्या तयारीला लागतो.

शेतकऱ्यांनी विकसित केले वाण
कमी पाण्यात खात्रीशीर उत्पादन कसे काढता येईल, याचा शोध घेताना वाणबदल करण्याचे इथल्या शेतकऱ्यांनी ठरविले. चांगल्या प्रतीचा गोल, रंगीत, चवदार, दुभाळका नसलेले कांदे अशा निकषांवर आपल्याच वाणांतून शोध घेतला. त्यातून मागील आठ वर्षांत निवड पद्धतीने वाण विकसित केले. त्याला स्थानिक भाषेत ‘चायना'' असे म्हटले जाते. अन्य वाणाच्या कांद्याला जिथे किमान १०० दिवस काढणीस लागतात, तिथं हे वाण ८० दिवसांत काढणीला येत. कमी कालावधी, कमी पाणी व  कमी खर्चात त्याची लागवड होते. यामुळे उत्पादनात एकरी १० ते १५ क्विंटलने वाढ झाली. निंदणी, कीडनाशक फवारणी, मजुरीच्या खर्चात बचत झाली. या म्हणीनुसार बीज शुद्ध करण्यावर भर दिला. काही वर्षांपासून सातत्याने त्यात सुधारणा केली. आता विश्‍वासार्ह बियाणे तयार करण्यात यश मिळाले.

शेतकरी गटाने केली निर्यात
निमोणमधील शेतकऱ्यांनी गट तयार केला आहे. शासनाच्या "आत्मा'' यंत्रणेचेही सहकार्य त्यांना मिळते. गटाने मागील वर्षी सौदी अरेबिया देशाला दोन कंटेनर कांदा निर्यात करण्यात यश मिळवले. येत्या काळात मार्के.िटंग व निर्यात यावर गट भर देणार आहे. : भाऊसाहेब गोसावी,९८५०७१७१५२.
अध्यक्ष- आई सप्तशृंगी शेतकरी गट, निमोण.
 : पंकज दखणे,  ९८५००३७३७६, गटसचिव

कांदा झाले  मुख्य पीक
साधारण १९८० च्या  दशकापर्यंत पावसाच्या पाण्यावर येणारी बाजरी, मका, मूग, भुईमूग अशी पिके घेतली जायची. त्या वेळी फक्त १० ते २० टक्के क्षेत्रावरच कांदा असायचा. मात्र, अर्थकारण सुधारण्यासाठी वीस वर्षांपासून कांदा हेच मुख्य पीक झाले आहे.

कमी पाण्यात उत्पादनाचे तंत्र
निमोणला सुरवातीपासून पाण्याची अडचण. पावसाळ्यात पाऊस अत्यल्प. बारमाही वाहणारी नदी नाही. जुन्या काळातील दोन नद्या आहेत. त्यावर जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पाझर तलावाची कामे झाली. पाऊस पडला, तरच बंधाऱ्यात पाणी साठते. तरच पुढे शेती चांगली होते. इथली बहुतांश शेती मुरुमाड आहे. पावसाळ्याच्या सुरवातीला थोडा पाऊस पडला, तरी जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत विहिरींना पाणी उतरते. त्या वेळी कांदापिकाची तयारी केलेली असते. रांगड्या भाषेत सांगायचे, तर विहिरींना नुसता घाम जरी आला, तरी इथला शेतकरी कांदा लागवडीचे धाडस करतो. अत्यल्प पाण्यातही चांगल्या प्रतीचा कांदा काढण्याचे कौशल्य इथल्या शेतकऱ्यांनी अवगत केले आहे.

Monday, 21 May 2018

शेवग्याने बनविले लखपती !



Thanks to
लोकमत  न्यूज  नेटवर्क
Published: May 22, 2018 02:44 AM | Updated: May 22, 2018 02:44 AM

 भातशेतीमध्ये काही मिळत नसल्याची खंत चेतन याला लहानपणा पासून  होती  .
विक्र मगड : पालघर जिल्ह्यातील विक्र मगड तालुक्याच्या मुहु खुर्द गावातील शिक्षक असलेल्या चेतन रमेश ठाकरे याने शेवग्याच्या शेंगांच्या पीकातून अनोखी समृद्धी प्राप्त केली आहे.
येथील शेतकरी आजही तोट्यात असलेल्या पारंपारीक भातशेतीवरच जगतो आहे. मुहु खुर्द या गावातील या तरुण शेतकऱ्यांनी मात्र वेगळी वाट चोखाळली आहे. वडिलांच्या नावे असलेल्या जमीनीत आजपर्यंत पारंपरिक भातशेतीच केली जात होती तर त्यापैकी मुरबाड- दगडमाळ असलेली जमीन वर्षानुवर्षे पडीक अवस्थेत होती.
भातशेतीमध्ये काही मिळत नसल्याची खंत चेतन याला लहान पणापासून होती. काहीतरी वेगळे करण्याची संकल्पना त्याच्या लहानपणापासून होती. मात्र घरची परिस्थिती बेताची होती. आणि त्यातच शिक्षण सुरु होते. त्यामुळे शेतीकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नव्हता.
मात्र शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तालुक्यातील शेतकºयांना एक वेगळी दिशा देण्यासाठी त्यांनी स्वत:च्या दगडाळ -माळरान असलेल्या पाऊण एकर शेतीमधे शेवंगा-मोरिंगा ह्या जातीच्या शेवग्याची लागवड केली तिचे सहा महिन्यात पीकही आले.
त्यांनी लागवडीसाठी जागा सपाट करणे, तसेच रोपे बनविणे, लागवाडी साठी खड्डे काढणे, शेणखत असा पाऊण एकर जागेसाठी एकूण १५ हजार रु पये खर्च केला आहे. त्यातच त्यांनी या शेवगा शेतीसाठी जीवामृत, शेण असे सेंद्रिय खत वापरले. त्यांनी ही शेवग्याची रोपे स्वत घरी बनविली त्यासाठी त्यांनी शेवग्याचे बी नाशीक वरु न मागविले होते.
पाऊण एकर जागेमधे ५०० झाडांची लागवड केली आहे. लागवडीसाठी त्यांनी ६ बाय ६ अंतरावर, १ बाय १ खोलीचा खड्डा खोदून रोपे लावली आहेत. त्याचे अवघ्या सहा महिन्यात उत्पादन सूरु झाले.
शेवग्यावर सहसा रोग कीड याचा प्रादूर्भाव होत नाही. शेवगा हे कमी जागेत, कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे पिक आहे त्याला पाच ते सहा दिवसातून पाणी दिले जाते मोरिंगा या जातीच्या शेवग्याची शेंग जवळपास दोन फुट लांब होते. एका किलोत पाच ते सहा शेंगाच मावतात आणि शेवग्याच्या शेंगांना ५० ते ५५ रुपये प्रतीकिलो भाव मिळत असतो.
चेतन ठाकरे या शेतकºयांनी आपल्या शेतात जवळपास २ टन माल निघेल असा अंदाज व्यक्त केला आहे आणि त्यातून एक लाख ते सव्वा लाखाचे उत्पन्न येणे त्यांना अपेक्षित आहे. या शेवग्याच्या पिकामधे आंतरपीक म्हणून त्यांनी डांगर, मिर्ची, मका, टोमॅटो, झेंडू अशी विविध पीके घेतली आहेत.

Thursday, 10 May 2018

खेबुडकर, तुम्हांवर केली मी मर्जी बहाल

धूंदीत गाऊ
मस्तीत राहू
छेडीत जाऊ
आज प्रीत साजणा..,

गाण्यांवर कवीची inviscible signature असते !

मी हे गाणं ऐकले अन् वाटलं
हे जगदिश खेबुडकरांचं गाणं आहे का?
why?

कारण key word 'धूंद" वा धूंदी
plus निसर्ग..वेली पानं फुलं असेल तर you can bet it has great chances to be जगदिश खेबुडकर

मी search केला
आणि yess
जगदिश खेबुडकरच होते.

मी 4 th May (पूण्यतिथी)एक कार्यक्रम पुण्यात पाहिला होता devoted to जगदिश खेबुडकर.

अशोक सराफ यांची reaction video clip दाखवली,ते म्हणाले,
"एक माणूस उच्च स्थानावर जातोआणि सात दशकं तिथच रहातो हे अद्वितीय आहे"
कारण rise अन् fall हा निसर्गनियम आहे.


त्या कार्यक्रमात त्यांची खूप hit गाणी गायली होती,
he was hard worker
never give up attitude.
म्हणजे inspiration + perspiration चा अनोखा संगम होते ते.

पिंजरा साठी त्यांनी 49 लावण्या लिहिल्या ज्या v.shantaram यांनी reject केल्या,

निराश होऊन जगदिश खेबुडकर घरी गेले,विचार करत राहीले
stylized विचार...

रात्री 2:30 वा v.shantaram ना फोन लावला,

तुम्हावर केली मी
मर्जी बहाल
नका सोडून जावू
रंगमहाल

pass !
rest is history !!

पापण्यांची तोरणं
 बांधुन डोळ्यांवरती
ही नजर उधळिते
काळजातली पिरती
जवळी यावं, मला पुसावं,
गुपीत माझं खुशाल


तुम्हांवर केली मी मर्जी बहाल
नका सोडुन जाऊ, रंगमहाल


हुरहुर म्हणु की ओढ
म्हणू ही गोड
या बसा मंचकी,
सुटंल गुलाबी कोडं
विरह जाळिता मला रात ही
पसरे मायाजाल

तुम्हांवर केली मी मर्जी बहाल
नका सोडुन जाऊ, रंगमहाल


लाडे-लाडे अदबीनं
तुम्हा विनविते बाई
पिरतिचा उघडला
पिंजरा तुमच्या पायी
अशीच ऱ्हावी रात साजणा,
कधी न व्हावी सकाळ


तुम्हांवर केली मी मर्जी बहाल
नका सोडुन जाऊ, रंगमहाल

Saturday, 5 May 2018

शाश्वत शेती : सौ. सुप्रिया अवधूत भिडे

copy paste
forwarded
(salute to writer   सौ. सुप्रिया अवधूत भिडे )
पुर्णपणे शाश्वत शेती करायची या उद्देशाने आम्ही आमचं गावं गाठलं आणि काही अडचणी समोर आल्या .त्यातील मुख्य अडचण म्हणजे देशी बियाणे मिळणे.गावात आजूबाजूला चौकशी करून सुध्दा खूप पिकांची देशी बियाणे मिळेनात पण शोध चालूच ठेवला तेंव्हा एक नाव समोर आलं संजय पाटील.गेली 12 वर्षे हा माणूस देशी बियाणे जतन आणि संवर्धन यावर काम करत आहे.त्यांच्याशी बोलताना काही  गोष्टी समोर आल्या ज्या शेअर कराव्या वाटल्या तेच लिहीत आहे

         सध्या जगभरातील सगळ्या बियाणांची जी बियाणे बँक आहे ती नॉर्वे या देशात आहे  . तेथील काही कंपन्याच्या ताब्यात जगातील सर्व बियाणे आहेत .हरितक्रांतीच्या नावाखाली, अधिक उत्पादन देतील अशी आम्ही बियाणे बनवतो असे सांगून जगभरची सगळी बियाणे जमवून त्यावर प्रक्रिया करण्यात आली ;आणि मग नवी बियाणे त्या कंपन्यांच्या नावाने पेटंट मिळवून बाजारात उतरवली. शेतकऱ्यांना ही लालूच दाखवली की आपल्याला एका वेळी जास्त उत्पादन ,कमी वेळ ,कमी श्रम हे सगळे  ह्या संकरित बियाणाने साधता येते. साहजिकच जगभरची लोकं ह्याला भुलली आणि आपले स्वतः चे बियाणे टाकून हे तथाकथित उत्तम बियाणे घेतले.आता अशी परिस्थिती आली आहे की आपली पूर्वीची बियाणे तर नष्ट झाली आहेत आणि जी संकरित बियाणे आहेत ती तर परत वापरताच येत नाही .मग या कंपन्या देतील तरच आणि त्याच भावात  आपण अन्न पिकवू शकू .ते सांगतील त्या अटींवर जगाला ते नाचवत आहेत.कोणत्या देशाने काय पीक घ्यायचे हेही तेच ठरवतात .

            पण  सुदैवाने आपल्या देशात मात्र अजून काही प्रमाणात देशी बियाणं जिवंत आहे . त्याची जी कारण आहेत ती  म्हणजे आपली जैव विविधता ,आदिवासी लोकं (ज्यांना आमच्या तथाकथित विकासाचा गंध नाही ),काही जुन्या रूढीं परंपरा , आणि महिलांच्या परसबागा .
                 तसेच आपल्या पैकी खूप कमी लोकांना माहीत आहे की ज्या देशांना आपण विकसित म्हणून नावजतो त्यापैकी खूप देशांत शेतकऱ्यांनी त्याच्या  शेतात काय पिकं घ्यायचं हे सरकार ठरवतं. ते ही या बियाणं कंपनी सांगतील तेच पिकं घ्यायचं. पण सुदैवाने भारतात अजून अशी पद्धत नाही म्हणून छोटे छोटे शेतकरी आपलं बियाणं जगवू शकतात.


              आपल्या कडील सण साजरे करण्यामागे काही उद्दिष्टे होती .उदा.आपल्या कडे नवान्न पौर्णिमा म्हणून साजरी करतात .त्या दिवशी माझ्या कडे जे पिकं आलं त्याचे तोरण दाराला लावायचे. म्हणजे जे धान्य माझ्या तोरणात नाही ते पिकं मी घेतले नाही हे कळायचं. इतर लोकं ते धान्य मला देणार मीहि तसेच करायचे.
दुसरा सण संक्रांत यात प्रत्येक स्त्री 5  जणींना वाण द्यायची त्यात आपल्याकडील बियाणे असायचे .म्हणजे एका घरी वेगळी 25 बियाणे मिळायची . आता शहरांशी  संपर्क आल्यामुळे गावातील बायकाही प्लास्टिक डबे वाण म्हणून देतात . कारण शहरात शिकलेली माणस राहतात ते थोडीच चुकणार आहेत .


             आपल्याकडे बियाणे विकणे हे पाप होते.आता पाप पुण्य हा ढोंगीपणा झाला त्यामुळे हे सण   नष्ट झाले . नाहीतर नुसता उपचार राहिला सण साजरा करायचा.
      नंदुरबार जिल्ह्यात  अस्थम्भा नावाचा डोंगर आहे तिथे अजूनही दिवाळीनंतर 150000 लोकं अश्वत्थामा च्या दर्शनासाठी येतात. नैवेद्य म्हणून आपले बियाणे आणतात आणि प्रसाद म्हणून तिथे ठेवलेलं बियाणं घरी नेतात.कोणीही हा उत्सव आयोजित करत नाहीत तरी रुढी नुसार स्वतःहून लोकं जमतात आणि बियाणांची देवाण घेवाण होते.

                आपल्या कडे धान्य साठवणे ,बियाणे टिकवणे ह्याच्याही खूप विचारपूर्वक तयार केलेल्या पध्दती होत्या .पण त्या आता गावातूनच हद्दपार झाल्या.
गावातील जुन्या लोकांना घोळात घेऊन विचारले की तुम्हाला या पद्धती कश्या माहीत नाहीत तर म्हणतात आमची मुले शाळेतून शिकून सवरून आली आहेत. ते म्हणतात तुम्ही अशिक्षित आहात तुम्हांला काही कळत नाही.तुम्ही नका शिकवू आम्हाला. हा अनुभव आमचाच नाही तर सेंद्रिय शेतीत काम करणाऱ्या खूप जणांना आलेला  आहे .खरंतर या लोकांना खूप ज्ञान आहे पण आपण अडाणी या न्यूनगंडा मुळे काही बोलत नाहीत.1922 ते 1938 भारतात सर अल्बर्ट हॉवर्ड नावाचे इंग्लंड चे शेती संशोधक येऊन गेले त्यांनी ब्रिटिश राणीला सांगितले होते की भारतातील प्रत्येक शेतकरी हा संशोधक आहे त्याला नष्ट करू नका जगाला ते घातक ठरेल.पण इथले शास्त्रज्ञ मात्र आमच्या शेतकऱ्यांना वेडं ठरवतात.नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील एक अत्यंत खेडूत बाई ' राई बाई पोपेरे 'ह्यांचे बियाणांवर खूप काम आहे. पण जेव्हा पहिल्यांदा त्या स्टेजवर बोलणार होत्या त्यावेळी  समोर माशेलकर, भटकर,अकोलकर असे शास्त्रज बसणार आहेत मग काम जरी या बाईचं असेल तरी कोणीतरी शिकलेल्या माणसाने प्रेझेन्टेशन द्यावे अशी संयोजकांनी मागणी केली . पण संजय पाटीलांनी ते न ऐकता त्या बाई बोलणार हाच आग्रह धरला .ज्यावेळी त्या बाईने आपले ज्ञान दाखवले .तेंव्हा ही मंडळी आवाक झाली.ही शास्त्रज्ञ मंडळी तेंव्हा पासून त्यांच्या कडे जायला लागली .पण आमचा दृष्टकोन कधी बदलणार?
           आम्ही आमच्या पूर्वजांना नावं ठेवतो की माणसाची ओळख ते जातीवरून करायचे किती संकुचित होतें ते. पण दुर्देवाने सध्या  आपण माणसाची ओळख त्याच्या साक्षरते वरून करतो.त्याने ह्या युनिव्हर्सिटी हे संशोधन केले म्हणजे त्याला या बाईपेक्षा कितीतरी ज्ञान असणार असे आपण गृहीत धरतो.भारतात अश्या कितीतरी राईबाई आहेत ज्याच्याकडूनच आपलं जुनं शेती तंत्र आपल्याला कळू शकतं.या शास्त्रज्ञांनी प्रयोग शाळेत संशोधन केलेले असते ते कित्येक वेळी जमिनी वर लागूच होत नाही असे अनुभव आलेले आहेत.


              असे म्हणतात की भारतात तांदळाच्याच 15000 जाती होत्या. त्या नष्ट होऊन फक्त 500 वर आल्या आहेत पण ह्या जरी जाती आपण टिकवल्या तरी आपण जगात टिकू शकू.कारण भात हेच भारतचे मुख्य पिकं आहे .आता आपल्याला अश्या कितीतरी sites दिसतील की गहू किती त्रासदायक आहे आपल्याला हे सांगतात . हरितक्रांती च्या नावाने देशात मुबलक पिकं निर्माण होणार या गोंडस नावाखाली गहू आपल्यावर लादला .
मध्यंतरी रेशनवर 2 रु किलो गहू मिळायला लागला .त्यामुळे काही श्रम न करता जर धान्य मिळत तर शेती कराच कशाला ?असा विचार करून कोकणातील शेतकऱ्यांनी नाचणी घेणे सोडलं आणि घाटावर ज्वारी कमी पिकू लागली.कित्येक ठिकाणची ज्वारी आणि नाचणीची देशी बियाणे नष्ट झाली.त्यानंतर लगेच  असं संशोधन झाले आहे की नाचणी ,ज्वारी हे माणसाला हितकारक आहेत .म्हणून कित्येक डॉक्टर गहू बंद करून नाचणी आणि ज्वारी लोकांना खायला सांगतात  .म्हणजे परत ही पिकं घ्यायची तर बियाणे कुठलं ?याचं कंपन्याचं. नाहीतर यांचाच multi grain आटा घ्यायचा म्हणजे तुम्ही पिकवू नका आम्ही देते तुम्हाला वाटेल त्या भावाला.
                 पूर्वी आपल्या कडे धान्याची खूप variety होती.कोणत्या सणाला कोणते पदार्थ करायचे हे सगळे ऋतू,स्थळ ह्यानुसार ठरवले होते .ते सगळे आरोग्या साठी उत्तम होते .आता जागतिकरणं या नावाखाली फक्त गहू,तांदूळ आणि मका ह्या तीनच धान्यांनी आपलं  85 % खाणे व्यापून टाकलं आहे.त्यामुळे हळूहळू खूप प्रकारची स्थानिक धान्य लुप्त झाली आहेत.जी की निसर्गाने आपल्या साठी बनवली होती. ते नसल्याने आता नवनवीन  आजार निर्माण झाले.

या वर उपाय म्हणजे आपल्या जुन्या पद्धतीने परत शेती सुरू करणे.आपली शेती ही शाश्वत ,परस्पर पूरक होती. फक्त एक देशी गाय आणि देशी बियाणे ह्या वर उत्तम शेती होऊ शकते.गरज आहे ती फक्त ते जाणून घ्यायची.
                    सध्या भारतात या बियाणे जतनावर खूप लोकं अगदी जीवावर उदार होऊन काम करत आहेत.त्यांना multi नॅशनल co  धमक्या देतात पण तरीहि ते आपलेे  काम सोडत नाहीत. ही लोकं शेतकऱ्यांना जमा करतात त्यातील जुन्या लोकांकडून तेथील स्थानिक  बियाणांची माहीती घेतात .बाकीच्यांना पटवतात की देशी बियाणे च वापरा .जुन्या लोकांचे ऐका . तुम्हीच स्वतः त्याचे जतन आणि संवर्धन करा .बियाणे ही कधीही विकायची गोष्ट नाही  तसेच खरेदीही करायची गोष्ट नाही हे पटवतात . आपल्या कडील रूढी परंपरा ह्या शहरातील लोकांचे बघून सोडू नका, पारंपरिक पद्धतीने शेती केल्यास ती शाश्वत  ठरते.भरघोस उत्पादन याकडे न बघता चांगले पिकं या कडे लक्ष केंद्रित करा.
जागतिक करार नुसार आपल्या कित्येक बियांचे पेटंट हे या multi नॅशनल  co. कडे आहेत .त्यासाठी लढा देणे ,शेतकऱ्यांना स्वतः कडील बियाणं समृद्ध करून त्यांची पेटंट घेऊन देणे अशी अनेक जोखमीची कामे ही लोकं करत आहेत. अश्या लोकांना मदत सोडाच पण त्यांची साधी माहितीही आपल्याला नसते.
       या सगळ्यांना दिर्घ आयुष्य मिळो ही प्रार्थना आणि त्यांच्या कार्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा

Thursday, 26 April 2018

Reveiw मराठी नाटक : जुगाड...impressive




काल  25 एप्रील 2018 ला ज्योत्स्ना भोळे सभागृह,पुणे येथे हे नाटक पाहिले.


काय योगायोग आहे...

सकाळी पेपर मधे पोलीसांकडून छत्तीसगढ येथे 37 नक्सलवाद्यांचा खातमा ही बातमी वाचली आणि संध्याकाळी रिमोट नालमाची ह्या आदीवासी पाड्यावर घडणारं नाटक पाहीलं !

योगायोग
योग म्हणजे जोडणं
'य' चा ग्राम्य अपभ्रंश 'ज' होतो आणि योग होतो जोग.
जोग पासूनच होत असेल जुगाड,
अर्थ असावा ...जुळवणे..घडवून आणणे
engineering a plot वगैरे ?

(Jugaad : meaning on Quora: Hindi,Urdu, Punjabi word,innovative fix or a simple work-around, a solution that bends the rules,)

मेळघाट इथं भूकबळी अशी बातमी वाचली कि "काय स्वातंत्र मिळून इतकी वर्ष झाली तरी तिथं मदत पोचतं नाही,सरकार काय करतयं?" म्हणून दांभीक चरफडून आपण पेपरचं पान उलटतो, मनातून तो विषय झटकतो.
आणि IPL मधे काय झालंय बघतो.

(सरकार काय करणारं?
ती व्होटबँक आहे का बघणार..
क्वचीत कुणी डाॅ.आमटे परीवार,डाॅ.बंग परीवार व अन्य सन्माननीयअपवाद व्रतस्थपणे काम करतात)

before i forget,
मला या नाटकाच्या संगितकार कौशल इनामदार / सहकारी यांच कौतुक करुदे.

आदीवासी संगीत/ rhyth तालवाद्य जी वाजवलीत ती फारच मनोवेधक व आकर्षक आहेत.
इतकी की pls निर्मात्यांनी ती नेट वर उपलब्ध करावीच अशी विनंती आहे.
मी तर प्रेमातच पडलोय या rhyth devine कौशलच्या !!

कुठून त्यांनी ही वाद्य शोधली असतील, synthesizer वर काही african वाद्य असतात का? की त्यांनी स्वत: electronic device वर mixing करुन ही वाद्य तयार करुन मग हे rhyths वाजवलेत ?

या आदीवासी संगीतातून स्टोरी पुढे सरकते, its integral part of the play.
ग्रेट!

नेपथ्याला (शेखर नाईक) फूल मार्कस्
जंगल चा हुबेहूब आभास निर्माण केलाय, वाह !

कुठेतरी दूर नालमाची ही वस्ती आहे,
आणि अज्ञान, अशिक्षीतपणा,भगत,नालम्मादेवी ,त्यांच्या प्रथा,अड्याण्यांच प्रथा/ पापपुण्य या नावाने शोषण आहे,

प्रसाद म्हणून झिंग आणणारी,डोक्याचा वापर बंद करणारी मोहाची दारु आहे.

त्यांच्यातला एक शिकून वकिल झालेला (चिन्मय मांडलेकर) नालमाची चा नसलेला इतिहास लिहीण्यासाठी शहरी प्रोफेसर( हृषीकेश जोशी) ला फसवून वस्तीवर आणतो.

चिन्मय व हृषीकेश यांना समोरासमोर आणल्याबद्दल निर्माते व लेखक यांचे अभिनंदन .

चिन्मय व हृषीकेश हे दोघंहि  हुशार विचारी/लेखक आहेत/ दिग्दर्शक आहेत आहेत, त्यांना अभिनयाचं काम देऊन आधीच 50% यश निर्माते व लेखक यांनी निश्चीत केलय.

चिन्मय व हृषीकेश यांनी बेदम फटकेबाजी करत बाजी मारलीय हे शेवटी प्रेक्षकांनी वाजवलेल्या कडक टाळ्यांमधून कळतेच.

विशेष उल्लेखनीय म्हणून गुलाब (शुभांगी भुजबळ)चे नाव घ्यायलाच पाहिजे,
आणि इतर बारा जण सुध्दा perfect काम करताहेत.

विषय complicated आहे, विचारांच बुद्धीबळ आहे, analytical आहे.

दंगल मधला dialogue आठवला,
 "दाँव दिखाना एक है और लगाना एक है"

oh my god मधला दुसरा dialogue ही आठवला,
"बहोत दिनोंमे बाजार में नया भगवान नही आया"

म्हणजेच marketing
सोप्या भाषेत,'धंदा'.
वकील असून त्याच्याकडे marketing चे पुस्तक का सापडते याचा इथं खुलासा व्हावा.

नालमाची चा नसलेला इतिहास लिहीण्यासाठी आणलेला शहरी प्रोफेसर( हृषीकेश जोशी) नकार देतो, तुमचा ( म्हणजे समाजाचा ...जातीचा (?)) काही इतिहास नाही का तर म्हणे तुमच्यात कोणी मोठा माणूस (महामानव!) झालाच नाही.

वरुन भोळा,विनम्र व आतुन महाधूर्त वकील म्हणतो ,नसेल तर शोधा,नसेल तर जन्माला घाला आमचा महामानव !!

तो वकील असल्याने ,
अवत्या झोंब्या काकासाहेब हा आमचा ऐतिहासीक नेता होऊन गेला असल्याचे पुरावे ही देतो.

इथून पुढे त्या काल्पनिक महामानवाला पध्दतशीर grow करण्याचे जे मनसुबे कल्पनेने उभे करतो,ते अचाट संवाद ऐकतांना लेखकाच्या ( नितीन अग्नीहोत्री)कल्पनासामर्थ्याने आपण थक्क होतो,
प्रोफेसर त्यापुढे जात पार त्या महामानवाला संसदेत पोचवतो.
लेखकाने कल्पनेची खूपच उंची उडान घेतलीय हे मुळातच पाहणे आवश्यक आहे.

त्याच बरोबर हे आधी कुठेतरी पाहील्यासारखं वाटतयं का असं सूज्ञ प्रेक्षकांना वाटतं,लेखकाला काही इशारा करायचा आहे का असा ही प्रश्न पडतो.
पण हे एव्हढं abstract आहे की बात समजण्याची आहे, वर्णन करण्याची नाही, या अर्थाने 'अवर्णनीय' आहे.

तर असं नाटक पोचवायचं म्हणजे कठीण काम दिगदर्शक ने केलयं.

तर असं नाटकातील संवाद पेलायचे, पचवायचे अन मग पोचवायचे ,त्यातली तगमग दाखवायची हे सोपं काम नाही महाराज....

प्रोफेसर विलासराव ची आधीची हुशारी,तत्वाशी तडजोड मग एकदा खोटा स्थापन केल्यावर तो अमर होणार व येणा-या पिढ्या फक्त पुजारी होणार म्हणून तडफड व हे करणार नाही हे सर्व
हृषीकेश जोशी यांनी जबरदस्त सादर केलयं.

चिन्मय बाबत काय बोलावे, Tv वर अतिपरीचीत होवूनही अवज्ञा न होण्याचं त्यांच glamour आहे,एक magnetic व्यक्तिमत्व आहे, बालपणीच्या कष्टाने भावूक, शिक्षणाने वकील,मनाने मार्केटींग गुरु, लीडरशीप,दिखावू विनम्र,गावठी हुशारी या छटा ते सहजपणे दाखवतात, आदीवासी नाच करताही रुबाब दिसतो.

असा वकील,एका प्रोफेसर शी टक्कर घेऊन बौध्दीक आव्हान ऊभे करतो.

मग कोण जिंकते,
जाननेके लिये पाहिलेच पाहीजे,

जुगाड

काही सूचना ?
yes,
1) एका प्रसंगात प्रोफेसर सिगारेट स्मोक करतात,हे स्टेजवर नको.

2) दुसरे प्रोफेसर सल्ला देतात कि हा जो so called नेता आहे तो लुटारु व अत्याचारी आहे वगैरे,
पण please note कि हे रेकाॅर्ड ब्रिटीशांचे आहे 1935 सालचे,आपले क्रांतीकारकही त्यांच्या दृष्टीने लुटारु च होते !
मग हे कितपत स्विकारार्य आहे?

Sunday, 8 April 2018

बेभाव शेतकरी


बेभाव शेतकरी

सांगा विठूराया,
कष्ट जाती वाया,
आलो जीवनाया
मेटाकूटी

आधी पाण्याची बोंब
कसे उगवावे कोंब
महागाईचा आगडोंब
कुठे जावे

डोक्यावरी ह्या कर्ज
दवा काय या मर्ज
करावे का अन्नवर्ज्य
मंत्रालयी

शेतकरी बेभाव
चोर झाले साव
विठू रे घे धाव
वाचवाया

Tuesday, 20 March 2018

*_लेखक - श्रीराम दांडेकर* : समाधानी, साधे, अर्थपूर्ण , दुसऱ्यांना प्रेरणा देणारं आणि समोरच्याची काळजी करणारं जीवन जगायचं असतं ही शिकवण

*🤔😤 येत्या दहा/ पंधरा वर्षांमधे एक आधीची पिढी हे जग सोडणार आहे. कटू असलं तरी सत्य आहे, कारण जगरहाटी कोणी थांबवू शकत नाही.*

*या पिढीतले लोक थोडे वेगळेच आहेत. सकाळी लवकर उठणारे, रात्री वेळेवर झोपणारे , पाणी वाया न घालवता झाडाला घालणारे , फुलं देवासाठी तोडणारे, रोज पूजा करणारे., मंदिरात एखादी फेरी मारणारे, रस्त्यातून भेटणाऱ्यांची आस्थेने चौकशी करणारे, दोन्ही हात छातीशी नेऊन नमस्कार करणारे.*

*अन्न धान्य वाया जाऊ नये म्हणून बेतानेच स्वयंपाक करणारे आणि उरले तर गरीबाला देणारे किंवा दुसरे दिवशी त्याला नटवून मिटक्या मारत खाणारे , स्वतःची गैरसोय असूनही पाहुणे मंडळींच पाहुणचार करणारे, पर्यटनाबरोबरच तीर्थयात्रा करणेही न विसरणारे ,आपापले सण लक्षात ठेवून साधेपणे साजरे करणारे, अमावस्या, एकादशी, अधिक महिना लक्षात ठेवणारे, भगवंतावर श्रद्धा ठेवून काळजी त्याच्यावर सोडणारे (आणि त्यामुळे कठीण परिस्थितीतही मनःस्वास्थ्य टिकवणारे ). व्यसन करताना लाजणारे आणि समाजाच्या नजरेची भीड बाळगणारे, जुना झालेला चष्मा, तुटला तर चिकटवून, जुनी चप्पल फाटली तर शिवून आणि जुना बनियन गलितगात्र होईपर्यंत वापरणारे, उन्हाळ्यात पापड वाळवणारे, हात दुखेपर्यंत कुटून मसाला घरी बनवणारे आणि फक्त बाहेर घालायच्या कपड्यांनाच इस्त्री करणारे, खिशातला पैसा जपून वापरणारे आणि गरजेपुरतेच अन्न खाणारे.*

*असे लोक आता हळूहळू हे जग सोडून चालले आहेत. आपल्या आजूबाजूला किंवा घरात असे कोणी असतील तर त्याची चौकशी करा, काळजी घ्या. कारण ते जातील तेव्हा एक महत्वाची शिकवण त्यांचेबरोबर जाईल.*

*समाधानी, साधे, अर्थपूर्ण , दुसऱ्यांना प्रेरणा देणारं आणि समोरच्याची काळजी करणारं जीवन जगायचं असतं ही शिकवण जगातून नाहीशी होईल. त्यानंतर फक्त राहील,,,,,,, स्वार्थ, अविश्वास, चैन , असंवेदनशील मने , भकास कोडगेपणा आणि मोबाईलवरचे अगत्य !!!!!*  😩😢

*_लेखक - श्रीराम दांडेकर_*

Tuesday, 13 March 2018

नाटक: सोळा एके सोळा लेखक:विवेक बेळे , Must see पाहिलेच पाहीजे असे नाटक

नाटक: सोळा एके सोळा
लेखक:विवेक बेळे
Impression : Must see पाहिलेच पाहीजे असे नाटक.
11 मार्च ला बालगंधर्व ला पाहिले.


एकीकडे tv serials ला चिकटलेले प्रेक्षकवर्ग तुझ्यातजीव रंगला
दुसरीकडे उघडा सलमान व दिपीका कतरीना यांच्या चित्रपटाचे आकर्षण सोडून नाटकासाठी प्रेक्षक खेचणे हे आव्हान आहे,त्यातच bold web serials पहाणा-यांना खेचून नाटकाला आणायचं म्हणजे नाटकातही bold element हवा.

अशात प्रेक्षकांना जास्त "नाटकळत" न ठेवता लेखक विवेक बेळे, दिग्द. , निर्माते यांनी है नवीन नाटक आणले आहे.

नाटकळत  !!! नवीन शब्द, वाह वाह.
बेळेंचाच शब्द,प्रेक्षकांना नाटकळत ठेवू नका...

निशा,तिचा  पो कमीश्नर बाप/निशाचा bfअनीकेत/न दिसलेली अनिकेतची आई व निशाची rival भूमी.
स्टोरी सांगून रसभंग करण्याचे पाप मी करणार नाही,
आजकाल घरोघरी असतं तेच टीनएजर्स / friendship/ facebook/ mobile chatting/fb breakup /लोक काय म्हणतील?? मोबाईलला चिकटून रहाणे आणि पालकांनी चिंताक्रांत होणे वगैरे.

म्हणजे तेच आलू टमाटर प्याज पण
treatment वेगळी,
म्हणूनच dish  वेगळी , चटकदार, खमंग व मस्त.

आजकालच्या मुली आरशात पाहिल्यासारखे दुस-यांच्या मतामधे स्वत:ची प्रतिमा बघतात,त्यामुळे त्या fb च्या likes dislikes व comments ला अवास्तव महत्व प्राप्त झालयं.
रात्रीबेरात्री मोबाईलमधे मित्रमैत्रीणी आपल्याविषयी काय म्हणताहैत हे चेक करणाररे मुलं पाहून पालक अस्वस्थ होऊन मोबाईल काढून घ्यावा म्हंटले तर
ते ही अशक्य झालय.


काय संवाद आहे हा,

" प्रेक्षक जेव्हा डोळ्यात प्राण आणून नाटक बघतात, तेव्हा नाटककार / director यांना वेगळाच high येतो,
तो intemacy पेक्षाही उच्च असतो."





विवेक बेळे प्रेक्षकांची नस जाणतात हे माहिती होते पण ते एवढा तर्कशुध्द  interestingव कल्पक analysis करु शकतात हे माहीत नव्हते !

नाटक जोरात चाललयं हे प्रतिकात्मक दाखवण्यासाठी चक्क car चा speedometer दाखवण्याची त्यांची idea कसली भन्नाट आहे,त्यामुळे कुठे नाटकाने वरचा gear टाकलाय व भरधाव वेग घेतलाय,प्रेक्षक गुंतत गेलाय हे कळते.

70% प्रेक्षक स्त्रिया असतात,त्या तिकिट काढतात म्हणून पुरुष नाटकाला येतात,बसल्यावरही नाटक  कुठले माहित नसते,तिकीटावर नाव वाचतात.

दिग्दर्शकाला प्रेक्षकांतला एक sample प्रेक्षक पाहिजे असतो म्हणजे लोकांच्या सरासरी  आवडीनिवडीचा लिटमसपेपर टेस्ट  करुन त्या sample subject कडे सातत्याने monitor करुन त्याप्रमाणे स्टेज वरील नाटक live कमी जास्त edit करायचं ही theme.
(या आधी कुणीच असा विचार केला नसावा.)

ज्याप्रमाणे एकादा detective समोरच्याची हालचाल व देहभाषेवरुन त्याच्या मनात काय चाललय व कृती काय असेल याचे ठोकताळे बांधतो तसैच किंवा त्याहीपेक्षा सरस पद्धतीने दिग्दर्शक प्रेक्षकाच्या reaction चा अंदाज व्यक्त करतो ,आनंद इंगळेने ते अफलातून व्यक्त केलेय.

"नाटक हे प्रेक्षकाला अंधारात ठेवून सादर करण्याची कला आहे"

"शेवटचा सीन लिहितांना नाटककाराने त्याचे पावित्र जपलेच पाहिजे"

"शेवट लिहीतांना लेखकाच्या डोळ्यात पाणी आले नाही तर प्रेक्षकांकडून काय अपेक्षा करणार"

हे संवाद चमकदार तर आहे पण बेळे यांची नाटकावर असलेली कमालीची निष्टा दाखवते.

नाटक पडले तर पडू दे म्हणणा-या लेखीके ला,
"तसं बोललीस तर थोबाड फोडीन"
म्हणणारा मनस्वी दिग्दर्शक,
" थेअटरमधल्या रिकाम्या खुर्च्या पाहतांना काय होतं ते मी अनुभवलय"
हे ही सांगतो.


एक शेवट दाखवून नंतर अनेक वेगळ्या शक्यता दाखवतांना ते प्रेक्षकांना भूलभूलैय्यात टाकून नाटकात twist हुकूमी आणू शकतो याची प्रचिती देतात.

सर्व कलाकारांनी सुंदर काम केलय.
Especially आनंद इंगळे अगदी छा गये है, दिग्दर्शक व लेखक यांना काय पाहिजे ते, ते अचूक पोचवतात,आनंद च्या timing व पंचेस ला प्रेक्षकांनी instant दाद दिली.

हा सर्व वेगळाच form आहे.
its like making of a नाटक.

interval मधे वडा खातांना मी बायकोजवळ चिंता व्यक्त केली,
हे नाटक analytical आहे, बौद्धीक चाल,प्रतिचाल आहे,प्रेक्षक कसे receive करतील?
इतके हुशारीने लिहीलेल्या, direct केलेल्या, सादर केलेल्या नाटकाला जर कोमट टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला तर मला ते आवडणार नाही.

नाटकाच्या शेवटी कडक टाळ्यांची पावती देत प्रैक्षकांनी मला खोटं ठरवलं !
मला आवडलं ते!!






Tuesday, 6 March 2018

आनंद कल हो ना हो....

आनंद कल हो ना हो....

(लेखाचा उद्देश आपण वर्षानुवर्ष जे काही वाचतो व विसरतो, त्याचे conclusive सारांशरुप पहाणे,विचार व कृतीस प्रवृत्त करणे हा आहे)

पुर्वीचा मूव्ही 'आनंद' व हल्लीचा 'कल हो ना हो' मधे हिरो कँसरग्रस्त दाखवलेत.
आम्हाला एक संदेश कळला की जिंदादिल जगायचं असतं.

पण आम्हाला हा संदेश कळला नाही कि कँसर होण्याची कारणे काय,कँसर होऊ नये म्हणून जिवनशैलीत काय बदल करायला पाहिजेत.

का?

कारण हा रोग दुस-या कुणाला तरी होतो,आमचा काही संबंध नाही.

हॅलो,असा विचार करणे म्हणजे वाघ दिसल्यावर वाळूत तोंड खुपसणा-या शहामृगासारखे ठरेल,आणि आता वाघ दिसत नाही म्हणजे तो नाही असे समजणा-या शहामृगासारखे ठरेल.

आमच्या employer कंपनीने आम्हाला एक पुस्तक दिले,

Never be sick again
Health is a choice, learn how to choose it

by Reymond Francis

Title वाचून मी थक्क झालो,कुणी इतक्या खात्रीने कसे सांगू शकतो,

मी ते पुस्तक वाचले ( i was deeply absorbed in that book)

त्यात त्यांनी हेच सांगीतलेय कि आपण म्हणजे आपल्या पेशी.
पेशींना nutrition मिळेल तेच खा.

सर्वांला हे माहितच आहे की  (गर्भावस्थेपासून) पेशींचे सतत विभाजन होते,नविन पेशी जन्माला येतात. या अर्थाने काही आठवड्यांनंतर आपण संपूर्णपणे नवीन असतो (तरीही जुन्याच नावाने ओळखले जातो !! jokes apart)

नवीन पेशी ही जुन्या पेशीची डिट्टो काॅपी असावी लागते,त्यात सर्व प्रोग्रॅम पास आॅन ,हस्तांतरीत होतो.
यातील माहिती किती टेराबाईट असेल याची आपण तुच्छ मानव कल्पना करु शकत नाही, कारण माहीती फक्त तुमचीच नसून तुम्हारे बापजादे आणि त्यांचे पूर्वज यांचीही असते !
(new addition :One sperm cell contains 37.5 MB of DNA information, and one ejaculation is equivalent to transmitting 57.9 GB of information (a total of 62 MacBook Pro laptops).from Quoraanswer)

म्हणून तर आपण म्हणतो ,
"पोरीने डोळे अगदी so and so यांचे घेतलेत"
किंवा
" तू कोकणस्थ आहेस हे नको सांगू, ते चेह-यावर दिसतेच आहे"

ही वरकरणी दिसणारी माहिती, आत असणा-या अनंत माहीतीत,
"पेशींनो आता मरा !"
ही देशील instruction असते.

आणि ज्या पेशी बगावत करतात,"मरत नाही जा" म्हणतात,
तिथचं समस्या सुरु होते.
मग कँसर ची गाठ आणि वेगाने वाढ.

वर म्हटल्याप्रमाणे सतत विभाजन होते,नविन पेशी जन्माला येतात आणि
xerox copy defective आली तर पेशीतला प्रोग्रॅमही भ्रष्ट स्वरुपात हस्तांतरीत होतो,आणि मग अशा बंडखोर पेशी जन्माला येतात आणि अनिर्बंध वाढतात.

कँसर प्राचीन आहे,
पुर्वी लोक साथींच्या आजाराने,क्षय,मलेरीया अशा रोगांनी अल्पायुषातच मरायची,त्यामुळे कँसरला संधीच मिळायची नाही.

मी internet वर डायनासोर ला cancer झाल्याचे जिवाश्म fossil बद्दल माहीती नजरे खालून गेल्याचे मला चांगलं आठवतय.


आधूनिक कँसरची कारणे काय असावीत
* pestcides कीडनाशकांचा अतीवापर.
हरीतक्रांती ( लोकसंख्यावाढ ला उत्तर)
अन्नाचे उत्पादन वाढवण्यासाठी हे करावेच लागले.

अन्नातून आपल्या पोटात pesticides जातात.
काही pesticides पाण्यातून झीरपत drinking water source मधे जातात.
कालांतराने आपल्या पेशींचा प्रोग्रॅम हलवतात.

Living greens organics, jaipur
ह्या टेरेस गार्डन किट supply करणा-या कंपनीच्या intetveiw मधे त्यांनी स्पष्ट सांगीतले कि नातेवाईकांचे कँसर ने मृत्यू पाहिल्यावरच त्यांना टेरेस गार्डन किट supply चा व्यवसाय करण्याची प्रेरणा मिळाली.

http://www.esakal.com/citizen-journalism/esakal-citizen-journalism-dr-arjun-kumbhar-article-100748


* रंग / preservatives / additives
प्रक्रियाकेलेले अन्न आकर्षक दिसण्यासाठी हे उत्पादक वापरतात, त्यानेच उत्पात होतो.
यात कोल्ड्रींक्र आलीच.

* जिवनशैली : उशीरा पर्यंत जागणे, मध्यरात्री खाणे, वेग अडवणे (बराच वेळ  वाॅशरुम ला न जाणे), उशीरा उठणे, सतत भयग्रस्त वा संतप्त /उद्वीग्न रहाणे, सतत इर्शा,जलन,उशीरा पार्टीज करणे, प्रमाणाबाहेर drinks घेणे, तंबाखू सेवन वगैरे वगैरे वगैरे.


* अनुवंशीकता heridity

http://m.lokmat.com/nagpur/one-lakh-fifty-thousand-patients-breast-cancer-2015/



* मी drive करतांना रेडीओवर ऐकले,
एका आयुर्वेदतज्ज्ञाची मुलाखत सुरु होती, ते म्हणाले,
" हल्ली काही आजार कँसर मधे "परिवर्तीत" transforming होत आहेत, उदा. मधूमेह,"
दुर्दैवाने पूर्ण मुलाखत ऐकू शकलो नाही.

ही नवीनच माहिती मिळाली.

* तणाव stress
( माहितीच्या अतीरेकाने देखील काहींना तणाव येऊ शकतो.
म्हणून junk food जसे आरोग्याला घातक आहेत तसेच junk news देखील आरोग्याला घातक आहेत हा माझा original विचार आहे.खुशाल timesofindia app delit करा )

तणाव हा आधुनिक जिवनाचा अविभाज्य भाग झालाय.
आॅफिसमधला deadlines चा तणाव समजू शकतो.
विद्यार्थ्यांना अभ्यास,परिक्षा,admission,प्रवास, interveiws, carrier, jobs चा तणाव असतो.( hormons changes चा तणाव वेगळाच)
घरातही सास- बहू तणाव असतोच.
आर्थीक तणाव,बजेट ची जुळवाजुळवी.

हा कबख्त तणाव शरीराची केमीस्ट्री बिघडवतो, मुन्नाभाई म्हणतो तसा "केमीकल लोच्या" निर्माण करतो.

 Problems पासून पळण्यासाठी काहीजण शराब जवळ करतात, liver overtime काम करते, शेवटी काम न झेपल्याने enlarged liver / fatty liver वगैरेप्रकार निर्माण होतात.

आता मला माझ्या original phylosophy विचाराबद्दल सांगायचं आहे,
ह्याला मी नाव दिलय,
" Please Open windows,
let wind flow,
let sun shine "

मी एकदा मुलांच्या रुम मधे बघितलं तर
खिडक्या बंद होत्या,
अंधारहोता म्हणून (दिवसा) lights लावले होते.
गरम होते म्हणून पंखा व AC सुरु होता.
मी पडदे सारले,खिडक्या उघडल्या तर रुम सुंदर प्रकाशाने उजळून निघाली, शुध्द हवेच्या झूळकेमुळे प्रसन्न झाली.
lights, पंखा, AC बंद करावे लागले.

हे पाहूनच मला वरील phylosophy सुचली.

Now we will globalize above phylosophy...

शहरात काय होतय,
कचरा वाढतोय,अस्वच्छता वाढतीय,
त्याला लागून रोग वाढताहेत
हा कचरा दुसरीकडे,दुस-या गावात  (उरळीकांचन)* नेऊन टाकतात,
का?
तेथे रहाणारी माणसं नाहीत का?

माॅल मधलं शाॅपींग किंवा pizza घरी मागवला तरी पॅकींग चा खूप कचरा घरी येतो, ( लोकांना आकर्षक पॅकींग मुळे प्राॅडक्ट खरेदी करण्याची भूल पडते)
ही शाॅपींग टाळली व आठवडे बाजारात कापडी पिशवी नेऊन शाॅपींग केली तर बरेचसे कच-यावर नियंत्रण मिळेल असे वाटते.

या कच-याची विल्हेवाट कशी लावायची?हा मोठा प्रश्ण आहे.
थर्मोकोल,पॅकींगप्लॅस्टीक ची विल्हेवाट कशी लावायची हे मी सांगू शकत नाही.

पण ओला कचरा,अन्न व किचनवेस्ट प्रत्येकाने घरी कंपोस्ट युनिट केलेच पाहिजे.त्याला जोडून टेरेस गार्डन असावी म्हणजे कंपोस्ट खताचा वापर व घरची भाजी मिळेल.
pesticides मधून काहीअंशी सुटका मिळेल.
यातून खूप उर्जेची बचत होईल.
( जशी वरील lights, पंखा, AC बंद केल्यामुळे झाली)

कँसर वर preventive उपाय काय असू शकतो?

एक सांगावसं वाटतं, आम्हाला complicated ideas चांगल्या कळतात,
पण सोप्या गोष्टी कळत नाहीत !!
Its too simple to understand.

माझ्या मते ज्ञान हे मर्यादित असते,
आणि माहीती अमर्याद असते.
तर माहीती information च्या महापुरा वाहून जाऊ नका.

शाळेत शिकलो ते च ज्ञान वापरु या.
1.पाणी भरपूर पिणे
2. रात्री लवकर झोपणे, सकाळी लवकर जागे होणे.
3. थोडा व्यायाम करणे, 24 तासात 24 मिनीटे तरी brisk walking करणे.
4. साधा आहार घेणे.
    back to भाजी भाकरी.
ऋजूता दिवेकर म्हणते जे तुमची आजी खात होती तेच खा ( bcoz you are genetically designed for it)

आहारात carbohydrates कमी करुन proteins वाढवा.
साखर बंद करा कारण साखर कँसर ला पोसते अशी एक विचारधारा आहैे.

5. ताण तणावांचे नियोजन करा.

6. परफेक्शनीस्ट चा नाद सोडा.
    Even God is not perfect
    असं सुश्मीता म्हणालीय, डोळ्यातल्या minor squint वर इलाज करणार नाही कारण देवही परफेक्ट नाही व हिच त्याची सुंदरत: आहे.

7. लोग क्या सोचेंगे ?
हा विचार मनातुन काढा, कुणालाही तुमचा विचार करायला वेळ नाहीये.

शायर म्हणतात,

दुनिया के निगाहोंमें,
भला क्या है बुरा क्या,
ये बोझ अगर दिल से,
उतर जाये तो अच्छा.

8.नियमीत medical check up.

9. Last but not least,
   छंद hobby जोपासा,
   anything जे तुम्हाला आनंद देते,
    त्यासाठी वेळ काढा च.
वाचकहो आपणास काही additions सुचवायचे असतील तर please feel free to suggest, i will add it in this post.

 Life's Good.
 Live to the fullest.

New addition :
Kerala's noted oncologist and Dr. P.V. Gangadharan, who is fondly referred to as ‘Saint with a Stethoscope’ says:

(1) Avoid sugar. Cancer does not spread without sugar. Cancer will die on its own without sugar.

(2) Take a full lime and squeeze it into luke warm water. Take this for one to three months before breakfast. Maryland college of medicine says this is 1000 times more effective than chemotherapy.

(3) Take three spoons of organic or virgin coconut oil early morning and in the night to keep cancer at bay.

Make one of these choices, but be sure to avoid sugar.

I have been trying to spread this message for the last two years. Be sure to forward this important message. Avoid cancer.
Dr. P. V. Gangadharan
https://www.google.co.in/amp/s/www.deccanchronicle.com/amp/lifestyle/viral-and-trending/010717/a-road-less-travelled.html



Saturday, 3 March 2018

Seed infosys institute ?



येवोत द्रोणाचार्य कितीही,
काळ आता डरणार नाही,
दान आता अंगठ्याचे,
यापुढे करणार नाही !


Sinhgad institute ची कथा आपण पेपर मध्ये वाचतोच आहोत.
शिक्षक/ प्रोफेसर्स/ स्टाफ चा पगार सव्वा वर्षापासून दिला नाही, विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय वगैरे...


मी Python (programing language) शिकण्यासाठी Seed infotech मधे admission घेतली, Rs.12,000/--- भरले.

Sat- sun असा weekend (9:00 am ते 04:00 pm) तीन weekend classes होते.
काल ,Saturday ला 9:30 am ते 01:00 pm C and C++ revision घेतली, okay.

उद्याचा class बद्दल sms करुन सांगू म्हणाले.
संध्याकाळी sms आला,

Hi Student,
There will be off tmrw for Ur Python Weekend batch.
Thanks.
- Yogesh, SEED.

मी संतापलो,जर तुमच्या कडे faculties नव्हत्या तर course सुरु का केला??

मी Seed infosys institute ? मध्ये गेलो, noise केला, refund मागीतला.

त्यांनी टोलवाटोलवी केली,शेवटी तुषार (coordinater) ला भेटलो, त्याला स्पष्ट सांगीतले मला Seed बद्दल respect होता म्हणून मी शिकण्यासाठी आलो, but Im disapponted, Seedinfotech पण सिंहगड institute सारखी सडली आहे का?
मला course certificate च्या कागदामधे interest नाही,शिकण्यामधे आहे.

त्याने उद्या दुस-या batch मधे accomodate करतो सांगितले,
मी Sunday 4 march 2018 ला  9.00 to 10:00 am थांबून वाट पाहीली, python class चे कोणीही आले नाही.

आता मला सिंहगड institute मध्ये विद्यार्थ्यांना कसे वाटत असेल याचा अनुभव आला.

शिक्षणमहर्षी तुम्हाला शिक्षण देण्यासाठी बसले नसून धंदा करण्यासाठी बसले आहेत.

गंदा है पर,
धंदा है यह !!

तुमच्याकडून fees घेऊन ते पैसे इतरत्र जमीनीत गुंतवणे,नवीन institute काढणे,शिक्षक / विद्यार्थी बसू दे बोंबलत,ते काहिही करु शकत नाहीत हा आत्मविश्वास शिक्षणमहर्षींना असतो.

उपाय : विद्यार्थ्यांनो पुन्हा एकदा एकलव्य बना.
online ढीगभर paid corses आहेत, ते घ्या, शक्य असेल ते download करा म्हणजे offline आपल्याला suitable त्या वेगाने अभ्यास करा, स्वत: च्या notes काढा. शक्य असेल ती परिक्षा external द्या.
Teaching is learning !!
एखादा विषय इतरांना शिकवण्याचा प्रयत्न करा,शिकणारा अनेक प्रश्न उपस्थित करेल,त्याची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्हाला अजून अभ्यास करावा लागेल.
interveiw ला जा.
कमी पगारात काम मिळवा,काम शिकून घ्या,job hopping करा.
एकदा काम चांगले करता आले की मोबदला हक्काने वाढवून मागा.
"हकसे मांगो.
काम मात्र जीव तोडून करा.''

शक्य असल्यास contracter बना, स्वयंउद्योजक बना.

Saturday, 20 January 2018

Old memories of Snowwhite and seven Dwarfs show in Dubai

Image from net with Thanks .


That year may be 2002 or 2003.
In the morning we showed the commercial of Snowhite and seven Dwarfs stage show at some garden ( forgot the name of garden) to daughters, Rutuja and Rasika n promised them to go there in the evening.

We drove to Dubai and whole afternoon we were busy shopping and roaming at places.

Rutuja reminded about the show and I was nervous as I could know how to find location of that garden .
A feel of guiltyness started smothering me n Meetali.

Next show was after some days when I had my duty, so today was the last chance.

Whole days poor kids walked with us only dreaming for that show and now started driving back to Abu Dhabi.

Show was at 7:00 pm.

And it was already 6:50 pm.
I was cursing myself for my poor navigation skills n lack of planning to reach the show.


As I was hoping that kids may have forgotten or felt sleepy, then Rutuja again asked,
" Can we go for snow white show?"

Meetali was trying to convince that it won't be possible.

I was at speed of some 80 to 90  km/ h speed ...

And I saw a big banner, advertise of the very show and  a direction guide...Turn right to go to the garden ! (Safa Park)
I took decision in fraction of second...may be even not checked rear-veiw mirror , applied little brakes and sharply turned right.
Few minutes after we reached the garden.

All car parking was occupied, i parked the car away and we walked, may be 2 kms to reach main gate of garden.
Again inside may be 1 km walk, I still remember cold breeze and paining legs.

We bought tickets / some snacks and walked on the lawn at seats at the show.
Show was yet to begin.

Me and Meetali could not believe ourselves that we had made it.

The show was great and Rutuja and Rasika laughed and enjoyed at lot.

And we two got enormous not 'discribable Happyness' looking at her happiness.

Later i thought,It was not end of the world.
Why did I take the risk to take that unpropted right turn??
I could have gone further , take some service road and we could have reach to the garden .

This we may call a "parents internal drive to see kids happy" !! which may give now or never feel to a father.

Luck supported us that day that No accident happened.

Tuesday, 3 October 2017

गेल्या ३० वर्षात आपल्या देशात नेमकं काय घडलं?* नक्की वाचा.. 

*गेल्या ३० वर्षात आपल्या देशात नेमकं काय घडलं?*
नक्की वाचा..
लेख लिहिणारा माहित नाही पण त्याना सलाम.
खूप अभ्यास पूर्ण लेख, शेतकरी बंधूनी  कृपया वेळ काढून वाचा

तिस वर्षातले बदल या लेखात सामाऊन घेण्याचा प्रयत्न मी करत आहे.
शेतक-यांच्या आत्महत्या म्हणजे अनेकानेक घटनांचा परिपाक असतो, ती जशी सामाजीक बाब असते तसीच शास्त्रीय गोष्ट सुद्धा असते, त्याचं एकच कारण नसतं हे सांगण्याचा हा प्रयत्न.

दोन तिन दशकांआधी आपल्याकडे *सोयाबीन, कापुस* आलं.
*ज्वारी हळुहळू बाद होत गेली*.
ज्वारी गेल्याने कडबा (चारा) कमी झाला.
कडब्याचा चारा नसल्याने गाई म्हशी कमी झाल्या.
२०० बैलांचा गावातला पोळा ५० बैलांवर आला.
“खांदेमळणी” सारखे शब्द काळाच्या उदरात गडप झाले. गोधन कमी झाल्याने गावच्या गायरानांचं महत्व कमी झालं.
*गायराण म्हणजे “वेस्ट लॅंड”* असं नवीनच सुत्र चलनात यायला लागलं.
मग गावाबाहेरील गायरानांवर *अतिक्रमण* झालं.

सोयाबीनचा उपयोग स्थानिक ठिकाणी खाद्य म्हणून केल्या जात नाही त्यामुळे अन्न सुरक्षेचा मोठाच प्रश्न निर्माण झाला.
घरात चार पोते ज्वारी असली की कितीही भीषण दुष्काळात तरुन जाता यायचं.
एक आधार असायचा.
बिकट परिस्थितीत लोकं *ज्वारीच्या “कण्या”* खाऊन जगली.
ज्वारीच्या जाण्याने आता तसा आधार गेला.
सोयाबीन हे तेल बियानं, त्यामुळे जमीनीचा कस कमी झाला, नव नव्या बुरशी वाढायला लागल्या.
त्यातच *डि.ए.पी*. सारख्या खताच्या मा-याने मातीची जैविक संरचना बिघडली.
एकीकडे जमीन निकृष्ट होत जाणे, दुसरीकडे त्यात *शेणखताची कमतरता* यामुळे जमीनीची *पाणी धारण क्षमता* आणि जमीनीत पाणी मुरवण्याची क्षमता कमी झाली.
जमीनीत पाणी मुरत नाही म्हणून *भूजल* संपुष्टात यायला लागलं.
(सोयाबीन, कापुससारखी) एकसुरी पीक पद्धती आल्याने शेतातली जैवविविधता झपाट्याने घटली.
एकसुरीपनाच्या शेतीने एकाच वेळी सगळं पीक वाया जाण्याचं प्रमाण वाढलं.
एकाच वेळी सगळं पीक वाया गेल्याने *शेतक-यांच्या आत्महत्या* वाढल्या.
अन्न सुरक्षा नष्ट झाल्याने देशातल्या कुठल्या तरी प्रांतातलं खराब धान्य कमी भावात ग्रामीण भागात रेशन दुकानात पुरवण्याची जबाबदारी सरकारने घेतली.
*त्यातुन लाचारीचा जन्म झाला*.
*लाचारीतुन आत्मसन्मान गेला*.
*आत्मविश्वास गेला*.

 *छटाकभर गावात तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर रातोरात वाढदिवसांचे बॅनर लाऊन नेते बनलेल्या भुरट्या नेत्यांचं पीक आलं.*
ज्यांचे खायचेपण वांदे आहेत त्यांना सुध्दा नेता बनण्याच दिवसा स्वप्न पडू लागली आणि मग शेतीच्या चरकातून फ्रेस्टेट झालेल्या युवां ना कधी नव्हे ते महाराष्ट्र अस्मिता, परप्रांतीय वगैरे हेच खरे प्रश्न असल्याचा साक्षात्कार करुन देण्यात आला.
गावागावात अमूक पक्ष तमुक मित्र मंडळांचे फलक झळकायला लागले.
*इलेक्शन आले अन दारुचा कधी नव्हे एवढा महापुर ग्रामीण भागातुनसुध्दा वाहायला लागला*.
आपल्याच डोळ्यादेखत *२५ - ३० वर्षांची किती तरी पोरं दारु पिऊन पटापट गेली*?
इलेक्शन आलं, छटाक भर आकाराचं
*गाव विभागलं, दुभंगल*.
यातुन तहसील, कृषी विभाग, पंचायत समीतीकडे *सबसीडीसाठी* चकरा मारणा-या *लाचार शेतक-याची संख्या* वाढायला लागली.

 *दुध गेलं, तुर, मुग, उडीद गेले, तितर बाट्या गेल्या, कोंबड्या पाळण्यात कमतरता वाटायला लागली*, तणनाशकाच्या फवा-याने बांधावर तना सोबत येणा-या *जंगली भाज्या गेल्या, नद्या नाल्यातले मासे, खेकडे, झिंगे गेले, गायराणातले ससे गेले*;

त्यामुळे प्रथिनांचा, पोषणाचा प्रश्न उभा राहिला.
सकस अन्न नाही, किटकनाशकांच्या सतत संपर्कात, सतत मानसीक तनावात असल्याने ह्रदय रोग, कर्क रोगाचं कधी नव्हे इतकं प्रमाण ग्रामीण भागात वाढलं.
*शेती म्हणजे घाट्याचा धंदा झाल्याने, तिच्या बांधबंदीस्तीकडे कमालीचं दुर्लक्ष झालं*.
त्यातुन पावसाळ्यात शेतातली सुपीक माती नदीत गेली.
नदीचे पुरातन डोह मातीने उथळ झाले.
त्यातुन पाणी जमीनीत मुरवणा-या केशवाहीण्या चोक झाल्या.
नदी उथळ झाल्याने पावसाळ्यात शेतीला पुराचा धोका वाढला.
जमीनी खरवडून जाण्याचं प्रमाण वाढलं.
नद्या उथळ झाल्याने मास्यांची संख्या घटली.
तंबू, कन्नाश्या, डोकडे, टेप-या गेल्या अन तिलापीया, ग्रास कार्प, सिल्वर कार्प, आफ्रिकन मागुर परदेशातुन आपल्याकडे आल्या.
यातुनच मासेमारांच्या रोजगाराचा भिषण प्रश्न उभा राहिला.
*त्यातच मग सिंचन प्रकल्प आले*.

नेत्यांच्या, इंजीनीयरांच्या गब्बर पिढ्या सुखनैव नांदू लागल्या.
बियाणे, किटकनाशके अन खतांसाठी बाहेरच्या व्यवस्थांवरचं अवलंबत्व कमालीचं वाढल्याने स्थानिक ठिकाणी पराधीनता वाढली.
त्यातुनच मग नवीन ज्ञान गावात न येणे (उदा. बि.टी. तंत्रज्ञानाचं ज्ञान!) अन पारंपरिक ज्ञानाचा –हास होणे अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली.

जुनं निसटुन चाललं आणि नवीन येत नाही म्हणून *ज्ञानाची पारंपरिक तिजोरी* रिती व्हायला लागली.
अन दहावी पास कृषी सेवा केंद्र वाले आणि कृषी सहायक शेतक-यांचे गुरुजी झाले.
याच दरम्यान एक मध्यमवर्गीय सुखवस्तू नौकरदार वर्ग हळुहळू उदयास यायला लागला.
या वर्गासाठी महागाईची व्याख्या होती, *शेतमालाचे भाव वधारणे*.
हा वर्ग बोलनारा, लिहणारा, “प्रतिक्रिया बहाद्दर” याला सरकार घाबरुन असणार, हा वर्ग कांद्याच्या भावासाठी सरकार पाडायला मागे पुढे न बघणारा मात्र फेअर अंड लवली साठी कोणत्याही भावाची शहानिशा न करता डोळे मिटून घेणारा.

शेतमालाचे भाव वाढले की हा वर्ग *बोंब ठोकणार*. त्यातुन शेतमालाचे भाव इतर निविष्ठांच्या तुलनेत वाढलेच नाही.
उत्पादन आधारीत बाजारभाव हे शेतक-यांसाठी एक स्वप्नच राहिले.
परिणामत: कृषी उत्पादनात विक्रम करणारा, देशाला अन्न दारिद्र्यातुन बाहेर काढणारा शेतकरी दरिद्रीच राहिला.
सततच्या आर्थिक विवंचनेत आंब्याची, मोहाची झाडं आरामशीनच्या घश्यात गेली.

शेंदरी, लाडू, शहद्या, शेप्या, नारळी, तेल्या, कागद्या, केळ्या, दोडी, गोटी, आमट्या, खाऱ्या, दाडक्या ह्या आंब्याच्या जाती काळाच्या आड जाऊन कुठून तरी कलमी, बदाम अशा जाती बाजारात दिसायला लागल्या.
आंब्याच्या, मोहाच्या, डिंकाच्या, तेंदुच्या, चाराच्या (चारोळी), बिब्याच्या, मधाच्या, जंगली मशरुमच्या स्वरुपात आणखी किती तरी आधाराचे दोर कचाकच कापल्या गेले.
एका माती नाला बांधासाठी, पांदण रस्ताच्या दुरुस्ती साठी दहा रुपयांची वर्गनी न देणारा आमचा पठ्ठ्या गावातल्या मंदीर बांधकामासाठी सढळ हस्ते मदत करता झाला.

हे सर्व नियोजन बध्द पद्धतीने घडत गेले.
*निदान आपल्या पिढीने यातून  आता तरी  बोध घेऊन आपल्याच मुलाबांळाच भवितव्य सुरक्षित करावे*

*अजुनही वेळ गेलेली नाही.*
*नाहीतर आपल्याच समोर आपलाच अंधार
नक्की विचार करा.

सुजलाम, सुफलाम अशा या देशाचे आणि जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांचे हात बळकट करु या.

*धन्यवाद.* 🙏🇮🇳🇳
~~~~~~~~~~~~~~~

Forwarded as received 👆

Tuesday, 22 August 2017

पीकबदल, एकात्मिक शेतीतून प्रयोगशीलता , आभार e सकाळ


प्रेरणा घेण्यासाठी उदाहरण.
डाॅॅ.राजेश मांंजरेकर, डाॅॅ. मनोज तलाठी ,आभार
आभार e सकाळ

पीकबदल, एकात्मिक शेतीतून प्रयोगशीलता

अनंत महादेव मगर (वाशी, ता. रोहा, जि. रायगड) यांची केवळ दोन एकर शेती. मात्र, भाडेतत्त्वावर इतरांचे क्षेत्र घेत सुमारे २५ एकरांवर ते शेती कसतात. भाताव्यतिरिक्त पंधराहून अधिक क्षेत्रावर कलिंगड, काकडी, भुईमूग, यंदा कोहळा व जोडीला मत्स्यपालन अशी प्रयोगशीलता त्यांनी जपली आहे. अत्यंत कष्टातून व पीक पद्धतीचे उत्तम व्यवस्थापन करून त्यांनी शेतीत स्वतःला प्रगतिस्थानावर नेले आहे.
अनंत महादेव मगर (वाशी, ता. रोहा, जि. रायगड) यांची केवळ दोन एकर शेती. मात्र, भाडेतत्त्वावर इतरांचे क्षेत्र घेत सुमारे २५ एकरांवर ते शेती कसतात. भाताव्यतिरिक्त पंधराहून अधिक क्षेत्रावर कलिंगड, काकडी, भुईमूग, यंदा कोहळा व जोडीला मत्स्यपालन अशी प्रयोगशीलता त्यांनी जपली आहे. अत्यंत कष्टातून व पीक पद्धतीचे उत्तम व्यवस्थापन करून त्यांनी शेतीत स्वतःला प्रगतिस्थानावर नेले आहे.
रायगड जिल्ह्याचे भात हे प्रमुख पीक. पावसाचे प्रमाणही येथे जास्त. याच जिल्ह्यातील वाशी (ता. रोहा) येथील अनंत महादेव मगर तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. शेती हाच त्यांचा मुख्य व्यवसाय. मात्र, पारंपरिक चौकटीत अडकून बसता नवे प्रयोग करण्याकडे व तंत्रज्ञान आत्मसात करण्याकडे त्यांचा अोढा असतो. त्यादृष्टीने सुमारे आठ वर्षांपासून ते कृषी विज्ञान केंद्र, किल्ला-रोहा (केव्हीके) तसेच कृषी विभागाच्या नियमीत संपर्कात राहून त्यांचे मार्गदर्शन घेत असतात.
प्रयोगांची आवड जपलेले मगर
रायगड जिल्ह्यातील अन्य शेतकऱ्यांप्रमाणे मगरदेखील हे पीक घेतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून किफायतशीर, कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणाऱ्या कारली, कलिंगड, काकडी यांसारख्या व्यापारी पिकांकडे ते वळले. त्यांची केवळ दोन एकर शेती. मात्र, तेवढ्यावरच समाधान न मानता परिसरातील शेती भाडेतत्त्वावर घेऊन एकूण सुमारे २५ एकरांत ते विविध प्रयोग करतात.पीक फेरपालट, लागवड पद्धतीत बदल, पाणी वापराच्या पद्धती, पिकांमध्ये पॉली मल्चिंग अशा विविध बाबींचा वापर त्यांच्या शेतीत दिसतो.
यंदाचा कोहळा व त्यात काकडीचा प्रयोग
यंदा मे महिन्याच्या अखेरीस १७ एकरांवर कोहळा व काकडी यांचा मिश्रपीक प्रयोग केला आहे. यात एकानंतर दुसरी अोळ दुसऱ्या पिकाची अशी लागवड आहे. कोहळा हे दीर्घ तर काकडी हे कमी कालावधीचे पीक आहे. रायगड जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या क्षेत्रावर कोहळा लागवड झाली असावी. यात गादीवाफे, पॉली मल्चिंग व संकरित वाण यांचा वापर केला आहे. कोहळ्याची एवढ्या मोठ्या क्षेत्रावर लागवड करताना मागील उन्हाळी हंगामातील एक एकरांवरील कोहळा लागवडीचा अनुभव उपयोगात आला. दर तोड्याला दोन ते तीन टन तर सतरा एकरांत ७० टन काकडीचे उत्पादन मिळाले. त्यातून मिळालेल्या उत्पन्नाने कोहळ्याचा उत्पादन खर्च कमी केला असून, कोहळ्याचा नफा वाढण्यास मदत मिळणार आहे.
आठ जणांचे कुटुंब राबते शेतीत
मगर यांना तीन मुले आहेत. ट्रॅक्टर, जेसीबी भाडेतत्त्वावर देणे व शेती अशा प्रकारे कामांचे वर्गीकरण त्यांच्या मुलांनी केले आहे. आठजणांचे कुटुंब शेतीत मशागत, पेरणीपासून ते काढणीपर्यंत राबते. त्यामुळेच श्रम हलके झाल्याचे मगर सांगतात. पूर्वी हे कुटुंब छोट्या घरात राहायचे. शेतीतील प्रगतीवरच बंगलेवजा घर बांधता आल्याचे समाधान मगर यांना आहे.
मगर यांच्या शेती नियोजनातील बाबी
पीक फेरपालट
रासायनिक व सेंद्रिय खतांचा एकात्मिक वापर
काटेकोर जलव्यवस्थापन, ठिबक सिंचनाचा वापर
आच्छादन तंत्र व एकात्मिक कीड-रोग व तण नियंत्रण
पाण्यावर आधारित पीकपद्धती
कोकणपट्टीतील रायगड जिल्ह्यात खरिपात पुरेसे पर्जन्यमान असते. तसेच रोहा तालुक्यातून वाहणारी बारमाही नदी आणि कालव्यांची सोय असल्याने काही ठिकाणी पाण्याची मुबलकता आहे; परंतु काही ठिकाणी मात्र कालव्यांचे पाणी न पोचल्याने डिसेंबर-जानेवारीपासून पाण्याची उणीव भासू लागते. या समस्येवर मात करताना त्याला अनुकूल अशी पीकपद्धती मगर यांनी बसविली आहे.
अशी आहे त्यांची पीकपद्धती
स्वतःची दोन एकर शेती-एक एकर भात, एक एकर मत्स्यशेती
उर्वरित क्षेत्रात
नोव्हेंबरच्या दरम्यान सुमारे १७ ते २० एकरांत कलिंगड. त्यानंतर फेब्रुवारीत भुईमूग-
मेच्या सुमारास काकडीसारखे पीक- अलीकडे त्याचे प्रमाण कमी
जोडीला ३० ते ४० देशी कोंबड्यांचे पालन
शेळीपालनाचे नुकतेच शेड उभारले आहे.
शेतीतील व समाजसेवेतील उत्साह
भात, नाचणी, वरी, तीळ अशा पिकांचीही थोड्याफार प्रमाणात लागवड असते. मगर हे उत्साही शेतकरी आहेत. यापूर्वी त्यांनी जिद्दीने आणि कष्टाने बटाटा, कांदा, भेंडी, कारली, शिराळी आदींचे प्रयोग केले आहेत. कृषी विभागांतर्गत ‘आत्मा’समितीचे ते सदस्य अाहेत. रोहाच्या केव्हीकेसाठी ‘मास्टर ट्रेनर’ म्हणून कार्य करतात. स्थानिक शेतकऱ्यांच्या पुढाकारातून अलीकडेच स्थापन झालेल्या रोहा तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठान संघटनेचे त्यांना उपाध्यक्ष करण्यात आले आहे. तालुक्यातील अन्य शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांची अविरत धडपड असते. रायगड जिल्हा परिषदेचा प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांना गौरविण्यात आले आहे. आकाशवाणी, दूरदर्शन आदी प्रसारमाध्यमातून त्यांनी आपल्या शेतीचे तंत्र विषद केले आहे.
जागेवरच काही टन कलिंगड उपलब्ध
मागील ३० वर्षांपासून मगर कलिंगडाची शेती करतात. पारंपरिक पद्धतीने या पिकाचे एकरी १० ते १५ टन उत्पादन मिळायचे. तज्ज्ञांच्या सल्याने आधुनिक तंत्रांचा वापर सुरू केला. आज एकरी १८ ते २० टन उत्पादन ते घेतात. विशेष म्हणजे विक्रीसाठी त्यांना अन्यत्र जावे लागत नाही. सुमारे २० एकरांवर उत्पादित काही टन कलिंगड जागेवरच मिळत असल्याने व्यापारी बांधावर येऊन खरेदी करतात. त्यास किलोला ५ रुपयांपासून ८ रुपयांपर्यंत दर मिळतो.
मत्स्यशेती
कलिंगडातील उत्पन्नातून सुमारे एक एकरांत केव्हीकेच्या मार्गदर्शनाखाली तीन मत्स्यतलाव खोदले. त्यात रोहू, कटला, सायप्रिनस, टिलापिया या माशांचे संगोपन केले जाते. माशांना मोठी मागणी असल्याने यातून चांगली अर्थप्राप्ती होत असल्याचे मगर यांनी सांगितले.
शिकण्याची आस जपली
केव्हीकेमध्ये सातत्याने होत असलेली चर्चासत्रे, मेळावे, प्रदर्शने, प्रशिक्षण वर्ग आदींमध्ये मगर यांचा सतत सहभाग असतो. सन २०१४-१५ मध्ये केव्हीकेच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली एका वर्षात तीन पिके म्हणजेज भात- कलिंगड व त्यानंतर भुईमूग अशी पद्धती राबवून अत्यंत चांगले उत्पादन व उत्पन्न त्यांनी मिळवले.
- अनंत मगर-९२७३१११५५०
- डॉ. मनोज तलाठी, ९४२२०९४४४१ (लेखक कृषी विज्ञान केंद्र, किल्ला- रोहा,
जि. रायगड येथे कार्यरत आहेत.)

Wednesday, 16 August 2017

Tidyness , need of a crash-course !

नीटनेटकेपणा ट्रेनींंग ची गरज

"अग,रूममधे किती पसारा पडलाय,कशी रहातेस, आवर जरा"
"आई आता मला वेळ नाही,नंंतर आवरेन"
घरोघरी घडणारा संंवाद,
थोडंं जरा अजून realistic पाहिजे असेल तर..
" मी मेली मरमर मरुन सगळंं घर आवरुन जरा बाहेर गेले,तुम्ही लोकांंनी सगळा उकिरडा करुन ठेवलाय"
"तू आॅॅफिसमधे कसंं काम करतेस गंं,काय पसारा केलायस, आणि चहा प्यायला तुला अर्धा तास कसा लागतो?
वगैरे वगैरे
या विषयावर फोटो घ्यायला मी लांंब गेलो नाही, दोन कन्या रुम्स त्यासाठी पुरेशा samples देण्यासाठी काबील होत्या !


यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे Housekeeping विषयी मनात आदर respect नसणे.
दुसरे म्हणजे कामाचा उरक बद्दल अज्ञान असणे.
पसारा होतोय तर काही वस्तु जसे racks / stands /cupboards/ drawers/ containers जे काही आवश्यक आहे त्याची खरेदी करा.
जर सर्व काही आहे तर त्याचा efficience उपयोग करा.
Time : वेळ द्या , laptop / mobile बाजूला ठेवा,  आणि रुम आवरायला घ्या.
आनंंद घ्या: Housekeeping म्हणजे तुम्हाला कोणीतरी punishment दिल्यासारखंं तोंंड करु नका. music on करा आणि आनंंदाने पसारा आवरायला घ्या.

मला असंं ठामपणे वाटतयंं की ह्या generation ला tidiness च्या traning ची आवश्यकता आहे !!

जोक काय आहे माहितेय, मी स्वत: अजागळ / पसारीस्ट (नवीन शब्द = पसारा करणारा) आहे, मी काही ऐकायला किंंवा वाचायला लागलो ना तर मी कुणाचा नसतो, अगदी हरवून जातो.

म्हणून expert consult ..
बायको / सेक्रेटरी/ सहायक/कॅॅशीयर/नॅॅवीगेटर / reminder...आणि बरच काही म्हणजे मिताली हिचंं मत विचारायला पाहिजे.

Periodic review : आज आवरलं म्हणजे झालं असं नसतं, पुन्हा 3 आठवड्यांनी आवरणे must असते.

Try it : तुम्हाला खूप pleasant surprises मिळतील, हरवलेले earphones , काही कपडे, reciepts, socks जे तुम्ही पुन्हा buy केले,ज्याची गरज नव्हती. ते सापडेल.


Last but Not least : मटेरीयल्स कमी करा !!
न रहेगा बाँस,
न बजेगी बाँसूरी .

जूने charity ला देवून टाका.
आठवा प्रसिध्द tag-line,
"पुराना जायेगा, तभी तो,
नया आयेगा !! "

Think over it .
fyi / a

Monday, 3 July 2017

राहिबाईची ‘बियाणे बँक’* _लोकसत्ता - प्रकाश टाकळकर



copy paste

 त्यांचा परिचय खालील प्रमाणे#पद्मश्री_राहीबाई  

राहीबाई या आदिवासी, निरक्षर. महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्गम अशा अकोला तालुक्यातील कोंभाळणे हे त्यांचे गाव. असा त्यांचा सुरुवातीचा परिचय. नंतरचा परिचय द्यायला सुरुवात केली की, त्यांना निरक्षर म्हणायला कोणीही धजावणार नाही असे कर्तृत्व !

 काय केलंय या सामान्य बाईनं ?
अवाक व्हायला होतं त्यांच्याविषयी माहिती करून घेतल्यावर आणि विनम्रपणे हात जोडावेसे वाटतात त्यांना त्यांच्या असामान्य कामगिरीसाठी !!!

राहीबाई यांच्याकडे सर्व प्रकारच्या जुन्या गावठी पालेभाज्या व वेलवर्गीय भाज्यांचे बियाणे जतन केलेले आहे. हे कोणत्याही आंतरराष्ट्रीय सीड कंपनीकडे उपलब्ध नाही. राहीबाईकडे जे बियाणे आहे ते शेकडो वर्षे आपले पूर्वज खात होते ते मुळ स्वरूपात आहे. त्यांच्याकडे फक्त वालाचेच वीस प्रकार उपलब्ध आहेत. त्यांनी तीन हजार महिला व शेतकरी यांचा बचतगट बनवलाय. त्यांच्या मार्फत या भाज्या अस्सल गावठी व संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या जातात व त्यांचे बियाणे मडक्यात जतन केले जाते. हे पारंपरिक चविष्ट व नैसर्गिक बियाणे मुळ नैसर्गिक स्वरूपात जगात कोणत्याही कंपनीकडे नाही. 

सध्या आपल्याला ज्या भाज्या मिळतात त्यांच्या बियाण्यांचे उत्पादन आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी केलेले आहे. ती संकरित बियाणे असून त्यांचे yield जास्त असल्याने सर्व शेतकरी त्याचे उत्पादन घेतात. दुर्दैवाने commercial सोडा, परंतु घरी वापरण्यासाठी सुद्धा शेतकरी हे पारंपारिक उत्पादन घेत नाही. 
आज अशी परिस्थिती आहे की, या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु राहीबाईंनी 'सीड बँक' उभारली असून राहीबाईंच्या बँकेत आदिवासी परंपरेने जपलेल्या ५३ पिकांचे ११४ गावरान वाण आहेत. अहमदनगरच्या अकोलेसह चार तालुक्यात ५० टक्के शेतकरी हे गावरान बियाणे वापरतात.
विशेष म्हणजे प्रत्येक बियाणाविषयीची माहिती राहीबाईंना तोंडपाठ आहे.  देशभरातून 'कृषी तंत्रज्ञान' शिकणारे अनेक विद्यार्थी त्यांचा  हा प्रोजेक्ट बघायला येतात. संपूर्ण जगातील हा अशा प्रकारचा एकमेव प्रोजेक्ट आहे.

त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. 
त्यांच्या या अतुलनीय कामगिरीसाठी त्यांना भारत सरकारचा गतवर्षीचा ' पद्मश्री ' पुरस्कार बहाल करण्यात आला आहे.
🙏
------------------------------------------

*राहिबाईची ‘बियाणे बँक’*
_लोकसत्ता - प्रकाश टाकळकर_

कोंभाळणे हे अकोले (जि. अहमदनगर) तालुक्यातील खेडेगाव. गावाच्या एका टोकाला आदिवासी शेतकऱ्यांचे एक पारंपरिक पद्धतीचे कौलारू घर. घराच्या मागील डोंगरावर कथित विकास दर्शविणारी भिरभिरणारी पवनचक्क्यांची पाती, घराच्या एका बाजूला उतरत्या छपराचा गोठा, त्यात चार-पाच म्हशी. दुसऱ्या बाजूला अशाच उतरत्या छपराची एक खोली. त्या खोलीत प्रवेश करताच समोर जे दिसते ते पाहून कोणीही आश्चर्यचकित होते. पारंपरिक पद्धतीचे गाडगे, मडके, प्लास्टिकचे टीप, बाटल्या, प्लास्टिकच्या चौकोनी पेटय़ा ओळीने मांडून ठेवलेल्या. त्या प्रत्येकात वेगवेगळ्या प्रकारची बियाणे ठेवलेली. ही आहे राहिबाई सोमा पोपेरे (वय ५५) या आदिवासी महिलेची बियाणे बँक. विविध प्रकारच्या ५३ पिकांचे ११४ वाणांचे बियाणे येथे आहेत. हे सर्व गावरान बियाणे आदिवासींनी परंपरेने जपलेले. हे घर म्हणजे राहिबाईंचे ‘रिसर्च सेंटर’च आहे.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी एका कार्यक्रमात राहिबाईंचा उल्लेख ‘मदर ऑफ सीड’ असा केला होता. एका जीन बँकेच्या उद्घाटनाचे प्रमुख अतिथी असणाऱ्या अभय बंग यांनी ‘हा मान तुमचा’ असे सांगत फीत कापण्याचा मान राहिबाईंना दिला होता. नुकत्याच राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारेंच्या उपस्थितीत झालेल्या कृषी खात्याच्या एका कार्यक्रमात राहिबाई प्रमुख अतिथी होत्या. आज राज्यभरात अनेक ठिकाणी त्यांना मार्गदर्शनासाठी बोलावले जाते. या बियाणे बँकेला भेट दिल्यानंतर आणि राहिबाईंशी बोलल्यानंतर या सर्वाची यथार्थता पटते.
राहिबाईंचे माहेर कोंभाळणे गावातलेच. वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षीच त्यांचा विवाह झाला. अनेक वष्रे घर आणि शेत याशिवाय त्यांना दुसरे काही माहीत नव्हते. त्यांच्या सासऱ्याचा दराराच इतका होता की, दुसऱ्याशी बोलायचीही हिंमत नसे. राहिबाई निरक्षर आहेत. लहानपणी शिक्षण मिळाले नाही, पण वडिलांकडून खूप ज्ञान मिळाले, असे त्या सांगतात. परंपरेने आलेले निसर्गाबद्दलचे हे ज्ञान त्यांनी जोपासले, वाढवले. लहानपणापासूनच त्यांना बियाणे जमविण्याचा छंद होता. पारंपरिक पद्धतीने त्या बियाणे गोळा करायच्या. शेतात त्याचा वापर करायच्या. सुमारे दशकभरापूर्वी ‘बायफ’ संस्थेचे जितीन साठे यांनी त्यांची भेट घेतली, तेव्हा त्यांच्याकडे १७ पिकांचे ४८ प्रकारचे वाण होते. पुढे ‘बायफ’च्या मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे त्यांच्या कार्याला एक दिशा मिळाली. आज राहिबाईंच्या बियाणे बँकेत ५३ पिकांचे ११४ वाण आहेत. कडधान्यांमधील घेवडा, वाल, उडीद, वाटाणा, तूर, हरभरा, हुलगा आदी १० पिकांचे ३५ वाण. भात, बाजरी, गहू, नागली आदी तृणधान्याच्या सहा पिकांचे ३४ वाण. गळीत धान्यांमध्ये तीळ, भुईमूग, सूर्यफूल, जवस, खुरासणी या ५ पिकांचे ११ वाण. विविध प्रकारच्या भाजीपाल्यातील २६ पिकांचे ३२ वाण. रानभाज्यांमध्ये ६ प्रकारचे कंदांचे १२ वाण. शिवाय त्यांच्या घराभोवती असणाऱ्या अडीच-तीन एकर परिसरांत विविध प्रकारची चारशे-पाचशे झाडे आज उभी आहेत. विशेष म्हणजे या प्रत्येक वाणाची वैशिष्टय़े, उपयोग याची त्यांना खडान्खडा माहिती आहे. एखाद्या वाणाबद्दल विचारल्यानंतर ते कुठून आणले? ते औषधी आहे की नाही? त्याचा उपयोग काय? कुठे येते? अशी सर्व माहिती त्या सहजतेने सांगतात. हे ऐकल्यानंतर निरक्षर राहिबाई या बियाणांचा ज्ञानकोश असल्याची खात्री पटते. घराच्या परिसरातही त्यांनी विविध प्रकारच्या वनस्पतींची जोपासना केली आहे. त्यात फळझाडे, भाज्या, वेल यांचा समावेश आहे. हा सर्व परिसर हलक्या प्रतीच्या जमिनीचा. ही झाडे कधी सांडपाण्यावर, तर कधी डोक्यावर पाणी वाहून, कधी बलगाडीने पाणी वाहून त्यांनी जगविली. उन्हाळ्यात झाडांचा बचाव करण्यासाठी स्टोन मन्चिंग (दगडांचे आच्छादन) तंत्राचा त्यांनी वापर केला. परिसरातील डोंगरावरून गारगोटय़ा गोळा करून त्या झाडाच्या खोडाभोवती पसरवायच्या. त्यामुळे झाडाला घातलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होत नाही. झाडाभोवती गारवा टिकून राहतो. तेथे गवत उगवत नाही, झाडाला उधई लागत नाही. परंपरेने आलेल्या अशा अनेक गोष्टी राहिबाईंकडे आहेत. विशेष म्हणजे या सर्व झाडांची जोपासना सेंद्रिय पद्धतीने केली जाते.
वेगवेगळ्या पिकांसंदर्भात, बियाणांसंदर्भात आलेले ज्ञान राहिबाईंनी जपले, जोपासले, वाढवले आणि आता त्याच्या प्रसारासाठी त्या झटत आहेत. आरोग्यदायी जीवनासाठी पारंपरिक वाणांचा वापर केला पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या बियाणे बँकेतील बियाणे आज राज्याच्या विविध भागांत पोहोचले आहेत. काही वर्षांपूर्वी जी महिला दुसऱ्या माणसाशी बोलायला घाबरायची, तीच महिला आज पारंपरिक वाणांची महती सांगत आहे. पारंपरिक वाणांचा प्रसार हे त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय बनवले आहे.
अकोल्यासह जुन्नर, संगमनेर, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांत लोकपंचायत या संस्थेने केलेल्या कृषी जैवविविधता सर्वेक्षणानुसार या चार तालुक्यांत आदिवासी भागात आजही ५० टक्के शेतकरी गावरान बियाणांचा वापर करतात. ४१ टक्के शेतकरी गावरान वाणांची लागवड घरगुती वापरासाठी करतात, तर ३६ टक्के शेतकरी बाजारात विक्रीसाठी करतात. उर्वरित २१ टक्के शेतकरी दोन्ही कारणांसाठी लागवड करतात. अति पावसाच्या प्रदेशात आजही स्थानिक वाणांना बऱ्यापकी प्राधान्य दिले जात आहे. हे गावरान वाण टिकवण्यात आदिवासी महिलांचा मोठा वाटा आहे. राहिबाई पोपेरे ही या सर्व आदिवासी महिलांचा ‘चेहरा’ आहे असे म्हणता येईल.
देशी वाणांची अनोखी चळवळ..
काही वर्षांपूर्वी हळदीकुंकवात राहिबाईंनी वाण म्हणून झाडांची रोपे द्यायला सुरुवात केली. आपल्या रोपवाटिकेत तयार केलेली पाचशे-सहाशे रोपे त्या दरवर्षी वाटत असतात. डांगी जनावरे हे या परिसराचे एक वैशिष्टय़, पण त्यावरील लोकांचे आकर्षण कमी होऊ लागले होते. राहिबाईंनी या गावात डांगी जनावरांचा पोळा सुरू केला. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन ममताबाई भांगरे (देवगाव), शांताबाई धांडे (आंबेवंगण), जनाबाई भांगरे (जायनावाडी), हिराबाई गभाले (मान्हेरे), सोनाबाई भांगरे (िपपळदरावाडी) अशा अनेक महिला त्यांच्या चळवळीत सहभागी झाल्या आहेत. एक वेगळीच चळवळ राहिबाईंच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. अकोले तालुक्याचा आदिवासी भाग हा देशी वाणांचे आगर आहे. संकरित बियाणांच्या आक्रमणापुढे हे देशी वाण नामशेष होण्याच्या मार्गावर होते. मात्र आता त्यांच्या पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

prakashtakalkar11@gmail.com

Wednesday, 7 June 2017

You're never too young - or too old - to develop apps ...Alvin R. Cabral

I get lot of inspiration from this post
curtesy khaleejtimes dated 07 June 2017


Top (L-R) Amanda Southworth with Apple CEO Tim Cook, Masako Wakamiya, Gaby Ecanow. Mid (L-R) Yuji Sasaki, Riana Karim, Philipp Zakharchenko, Neel Sarwal, Bot (L-R) Leo Vallet, Emirhan Erdogan, Beatriz Magalhaes, and Yuma Soerianto.
One has 10. Another has 82.
No, that's not the number of apps they've made - it's the number of years they put in their 'age' column.
Before Apple's Worldwide Developers Conference officially kicked off at the San Jose Convention Centre on Monday, there was a little pre-event showcase on Sunday, which featured students - plus one not-so-young learner of the tech game - who flaunted their works of technological art and creativity.
It's actually the student developer showcase. The average age is 23.4 years, but that figure only got inflated because one of them was an 82-year-old woman who showed off her tech skills as if she were a teenager; take her age out and the average is 16.1 years - a very young group - including a 10-year-old - that is the future of innovation. (At last year's WWDC, though, there was a little Indian girl who was nine years old.)
The WWDC Scholarships are awarded to students and STEM organisation members with the opportunity to attend this year's five-day conference. They use Apple's Swift programming platform to develop their apps.
At this year's WWDC, the scholarship recipients represent 38 countries and 14 STEM organisations - both records to date.
Khaleej Times spoke with them to find out what makes them tick. They may come from different backgrounds and have various inspirations, but one thing is evident: truly, it is never too early or too late to learn something new, something that can contribute significantly.
Yuji Sasaki from Japan, 17
The self-taught developer started coding when he was 11. He's the one who's been into developing for eight years. His new app, 'Sumou', is a game of the traditional Japanese sport sumo wrestling. And being the sub-chief of his school's mathematical science club, he teaches the youngsters in his community to code.
"I have always liked making things. Making programs seem to be inspiring; the [app] development environment is for us amateurs - it's no different from professionals. It seems I have infinite possibilities to make the things I like."
Riana Karim from the US, 17
The high school senior's interests is in human health, so she created a Web-based app to collect and analyse data on the geographic prevalence of autism. For her efforts, she was recently recognised by the Society of Women Engineers and the National Center for Women in Technology. Right now, she's busy developing an app regarding the stars and constellations.
"Personally, I think the biggest challenge I had was not feeling qualified enough... to sort of combat that, I found a lot of resources online; you can learn a lot of things online, whether it be technical skills or anything else. A lot of online videos and documentations are available online... and there are companies that you can reach out to."
Philipp Zakharchenko from Russia, 16
He believes that design is very crucial for something to be engaging. His app, 'Deadliner', allows you to track and manage your deadlines, events and meetings, set goals and even create milestones. He learned coding at 12 with Visual Basic, but Swift totally changed him; within a week of learning the platform, he was able to make his first to-do list app.
"I'm excited because I feel that I can do something for this world - something that will help other people to do their everyday tasks... I really hope I can continue on my career in software development."
Gaby Ecanow from the US, 17
She has her own business - EcaKnow Games - the motto of which is so fitting: 'It's never to early to start coding!' Through a combination of self-teaching and online methods, she was able to learn C#, Python and Jave at the end of her sophomore year. She showcased her latest app, which can be so familiar to practically everyone - 'RoShamBo TicTacToe'.
"I believe that anyone can code as long as you put the time and the effort and you really believe in yourself. Anyone can pick it up; really shoot for the stars because your apps can change the world."
Beatriz Magalhaes from Brazil, 21
Learning that she had diabates at the tender age of 13 inspired her to come up with 'Diapets', an app that helps kids with Type-1 diabetes learn how to deal with their treatment with the help of a cute dragon. The digital media design student from Rio de Janeiro has been coding for two years and is very active in promoting the human side of technology.
"[Diapets] is a very personal project for me. I've always wanted to do something [about diabetes], so it's great that app development gives me this power to change things that matter to me and I think that everyone can change something very personal that matters to them - just by coding."
Neel Sarwal from the US, 17
Hailing from Dallas and with Indian roots, he began coding after receiving an iPod Touch for his 11th birthday, getting curious on how apps were developed. He currently has four games on the App Store - plus two more games and an app in the works for his startup.
"It's really easy to get into developing - even if you're super young or super old."
Amanda Southworth from the US, 15
The Los Angeles-based teen is concerned about your safety. Anxiety attack? She's got something for you: 'anxietyhelper', a mental health tool that gives you advice based on research about depression, anxiety and panic attacks. It also provides hotlines in cases of emergency, including police, hospitals and even shelter. Her other app - 'Verena' - which is for the LGBTQ community, meant to help them feel safe in times of emergency. Oh, and she began coding when she was 11.
"This app is here to help you, because the world can be sad and people need help, so this app can help people in a very significant way."
Leo Vallet from France, 20
Looking for a 'Flappy Bird' remake? The teen from Lyon has it for you on the App Store. Nowadays, he aims to solve the perennial problem of parking with 'ParkMatch', which is still under development, but looks really promising. Currently, he has over 20 iOS apps, and has been coding for over four years.
"I'd like to use technology and apps to help people out so they won't have problem when they park their vehicle... to create a win-win situation for everyone."
Emirhan Erdogan from Turkey, 19
After attending last year's WWDC, he founded his own firm, Appyist. Not only that, he also designed a six-week 'Hello iOS' course to help introduce people to the platform - the success of which led to founding TurkishKit, a monthly event for students interested in developing software for the Apple ecosystem.
"Coding is simple; it doesn't take too much time. My suggestion to students is to start learning how to code and design for mobile apps... it's never been easier."
Yuma Soerianto from Australia, 10
The youngest of this year's group taught himself how to code when he was only six years old, and at present he has four apps on the App Store. His dream: "Teaching the world how to code." And he has his own YouTube channel - 'Anyone Can Code' - so it's safe to say he's well on his way to fulfilling his dream.
"It's really fun to do this and I believe that even if you're very young you have the chance to make something that's really useful and make a difference."
Masako Wakamiya from Japan, 82
Yes, you read that right: 82 years old. She's walking and breathing proof that it's not too late for anything - especially in a technology-driven age she may have not imagined when she was the age of those she was with at the showcase. She's not a scholarship recipient, but is the oldest attendee. Her app, 'Hinadan', is a game that promotes the Japanese culture.
"I don't see age as a hindrance to develop apps... and it even makes me feel younger."
-alvin@khaleejtimes.com

Thursday, 25 May 2017

Theatre Reveiw : नाटक : वाय ....Impressive

काल 24 मे 17 ला ज्योत्स्नाभोळे सभागृहात (पुणे) हे नाटक पाहिले.



impressive सादरीकरण !

मला महत्व वाटतं हे नाटक येण्याच्या timing चं आजच आपण पेपर मधे मँचेस्टर वाचतो आणि संध्याकाळी हे analytical नाटक बघतो हा एक दुर्मीळ योगायोग म्हणावा का.

श्रीरंग गोडबोले यांची रंगमंचावर सादरीकरणकरण्या च्या माध्यमावर जबरदस्त हुकूमत आहे,ह्या fusion प्रकाराला काय म्हणतात माहीत नाही पण स्टेज आणि जरुर तेथे स्क्रीन वापरुन ते स्टोरी गतिमान पध्दतीने मांडतात, यात कल्पकता असते,त्यामुळे खूप उठाव येतो. (या साठी खूप planning / assistance व कलाकारांची शिस्त लागत असावी)

स्टोरी काय आहे सांगून मी पुढचा प्रयोग पहाणा-यांचा रसभंग करु इच्छीत नाही.ते स्टेजवर पहाण्यातच थ्रील आहे.

आपल्याभोवती घडत असणा-या घटनांचा तो calidoscope आहे. आपल्याला या विषयी काहीतरी मत असायला हवे, आजकाल कट्ट्यावर तरुणाई यावर चर्चा करते का माहीत नाही, कुणीतरी सुमार जस्टीन येतो, तिथे तरुण आणि उच्चभ्रू गर्दी करतात ते music ची समझ असते म्हणून नाही तर happening ठिकाणी आम्ही होतो हा selfi social मिडीयावर टाकायला.
मग तो जस्टीन काही तासातच करोडो रुपये खेचून जातो....ते ही lip singing करुन.

आपली संकृती विसरुन आपण पाश्चात्य झालो म्हणून दुसरीकडे काही कडव्या भारतीय संस्था जहालवादी झालेल्या असतात,स्वत: पडद्यामागे राहून गुरू सारखे हस्तक निर्माण करुन भाबड्या तरुणांचा प्याद्यासारखा वापर करतात.

दाभोळकर / पानसरे/कलबुर्गी यांच्या सारख्या विचारवंताच्या हत्येचा (राजकर्ते बदलूनही) तपास लागत नाही, हे आपण बघतो आहोत, त्यावर candle मार्च करणा-याचा एक वर्ग आहे,तसेच याचा मागोवा घेणा-या पत्रकार आहेत, वर्षानुवर्ष तपास करणारे पोलीस आहेत.
हे सर्व रोज पेपरमधे वाचून नीर्विकारपणे पान पलटणा-या आपल्या मनोवृत्तीला हलवण्यासाठीच या नाटकाचे प्रयोजन असावे.

Tv वरच्या वांझोट्या चर्चा ही व्यंगात्मक दाखवल्याच आहेत,त्या जेवतांना पहाणारे प्रेक्षक यात हलके विनोदी पंच छान मारलेत.

नाटकाचा कॅनवास मोठा आहे, वरील सर्व विषय एकत्र बांधण्यासाठी ऐक प्रेमकथा,दोन कुटुंबे , काॅलेज, गुरु ची संघटना अशा अनेक समांतर गोष्टींची खुबी ने केलेली गुंफण व  प्रभावी  स्टेजस्क्रीन   सादरीकरण म्हणजे नाटक वाय.
वाय या अक्षराप्रमाणे दो-राहे वर उभ्या असणा-या तरुणाची ही गोष्ट आहे.

नाटकातील संगीत व गाणी खूप प्रभावी आहेत त्याबद्दल त्रय (हिृृषिकेश-सौरभ-जसराज ) चे खूप अभिनंदन.
एका गाण्यातले शब्द मात्र खटकले ,
( गो xx,गो xx,  तुझी गरज नाय !)
गाणं अंगावर येते...aggresive rap song आहे,चाल/rythm व गायन भन्नाट आहे. मी मागच्या पिढीचा प्रतिनिधी असल्याने शब्द खटकले, सध्याचे टीनएजर जर अशी भाषा बोलतात का ? goodness! पण संहिता script सेंसाॅर वाचते का??
कि गाणं नंतर अॅड केलं.

नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांच्या कोमट टाळ्यांचा प्रतिसादाची मला चीड आली,सणसणून टाळ्यांचा गजर ह्या पुणेकरांना करता येत नाही का!
किती research, किती planning, किती मेहनत,coordination लागतं,त्याची कदर व्हायलाचं हवी.
मला वाटतं याचं एक ट्रेनिंग प्रेक्षकांना सुरवातीला दिले पाहिजे.
कमी आवडलं = कमी टाळ्या डेमो
जास्त आवडल = जास्तटाळ्या डेमो
डोक्यावर घ्यावसं वाटलं = loud applaud

before i forget,
राजेश देशमुख यांच वेळोवेळी केलेलं निवेदन खूप दमदार झालं,आवाज छान लागला,शब्दोच्चार स्पष्ट व अर्थवाही वाटले.

सारळकर देवेंद्र चा स्टेजवर चा वावर,अभिनय सहजसुंदर होता, just effortless !
राधीकाचं पाठांतर amazing आहे (काही शब्द डोक्यावरुन गेले ,जर्मन होते का?)  घराची काळजी करणारी,मुलाचे दोष झाकणारी गृहीणी तिने छान उभी केली.

गुरु खूप झोकात उभा केला ( त्याचे असीस्टंट ही झकास रंगवले आहेत)
पत्रकारमधे रमेश भाटकर चा भास होतो.
देवयानी ने कला व कँडल संस्कृती बरोबर पोचवली
अरु चं काम छान झालं, काहीवेळा असणारे बोल्ड संवाद व movements करतांना तिचा ease खूपच काबील-ए-तारीफ आहे.
राग व हतबलता तिने perfect दाखवलीय.

शेवटी आपला हिरो,
घराघरात असे मुलं असतात,अंगात अमर्याद क्षमता पण दिशा माहित नाही,म्हणाल तर उद्धट पण आदर्श / गाॅडफादर मिळाला तर नतमस्तक होतात,यांना लूझर म्हटले तर खचतात,हिरो म्हटले तर उभारी घेतात.
गरज आहे मोहात न अडकता सारासार विचार करण्याची,कोणत्याही बाजूला अतिरेकी न झुकता मध्यममार्ग धरण्याची.
(रेगे फिल्म ची आठवण होते)

पलू (अंजनेय) पत्रकाराला समजवायला घरी येतो, तो प्रसंग माझ्यामते नाटकातला highlight प्रसंग आहे तिघांनीहि संवाद व त्यांच्या reactions खूप छान केल्यात, तिघेही आपल्याजागी बरोबर आहेत, या प्रसंगात ते तिघं / स्क्रीप्ट / direction यांना full marks.
शेवटी शॅडोग्राफीमध्ये,

" पिस्तुल तुझ्या हातात आहे,ट्रिगर दाबण्याचा अवकाश की..."

छा गये.
deserved laud appluad !










Tuesday, 23 May 2017

Charty with difference :दानवीर जानकी सेठ



मी रिक्षा त बसलो,पर्वतीहून मयूरकाॅलनीत सोलॅरीसजवळ जायला सांगितले.
2:45 pm 23 मे 2017



रिक्षावाला म्हणाला रस्ता सांगा,
"खरं तर मी फक्त पेशंट ला सवारी देतो"
"आता पेशंटला घेऊन आलो होतो,आणि मी पेशंटकडून मी फक्त अर्धे भाडे घेतो" !

माझ्या तार्कीक मनाला हे पटेना...

अर्धे भाडे ?
"हा...बाकी अर्धे भाडे एक मारवाडी सेठ देतो " !!

नवलचं

"हा, पेशंटचे भाडे रु.260 झाले, 130 घेतले, नंतर सेठ कडे जायचे, म्हणायचं, रु 260 झाले होते,
एक शब्द नाही,लगेच रु 130 देणार"

मी ऐकतचं राहिलो.

"बरं त्यांच काही फार मोठा धंदा नाही, छोटंस दुकान आहे, त्यांची मुलं ही त्यांच्या सारखी च दानी आहेत".


एकीकडे खा खा खात सुटलेली भ्रष्टाचारी राजकारणी मंडळी.
दुसरीकडे जानकीसेठ सारखी व्रतस्थ लोक !
कदाचित यांच्यामुळे दुनियेचा नैतिक तोल सावरला जात असेल.

काहिही संबंध नसलेले पेशंट काही रिक्षावाले हाॅस्पीटलला पोचवतात,त्यांच्याकडून अर्धेभाडे घेतात.

मग,
जानकीसेठ समोर उभे रहातात.

जानकीसेठ प्रश्नार्थक पहातो,
जे काही रिक्षाभाडे रक्कम ऐकतो,त्यावर विश्वास ठेवतो,
मारवाडी बुद्धी /हात चालतात,
क्षणार्धात अर्धेभाडे देतो,
काहीच न घडल्यासारखे दुस-या कामाकडे वळतो