Saturday, 25 July 2015

Satute to Prajakta Gavhane for breathless lyrics



Prajakta Gavhane's Lyrics

Breathless Marathi Song / ब्रेथलेस मराठी गीत

Prajakta Gavhane
Great lyrics for breathless ( sung by bela shende)

मन शहारे काहुरे दूर देशी मी चालले
वाटे सोडू नये गाव, आसू डोळयांस या सांगे
गूढ पायवाट राही मागे मागे मागे मागे
धागे पाणंदीचे मनी, गाव आठवांचा जागे
सय मनात मावेना, धग उरात सोसेना
सोस सोसण्याचा भारी, त्याला वेसच दिसेना
वेळू लपेटून वाहे, माझ्या गावची ही नदी
जणु चाकातून बुक्का उडे गावची ही माती
माती भुरळ घालते, नाही विरळ हे नाते
नाते विरहातसुध्दा गीत मातीचे या गाते,
गावी कौलारू घरांना शोभे आंब्याचे तोरण
उंच पिंपर्णीची झाडे साद घालती बेचैन,
गेरू रंगवावा तसा रंग रंगतोया जीव,
शीव ओलांडता खूपे, जसा निवडुंगाचा पेव,
मन इथेच दंगते, मन इथेच सांडते
ओवी ओवीत गंफुनी मन भजनी रंगते,
मन वाऱ्यावर वाहे
वारा चाफ्याशी या बोले
चाफा रामाच्या पुढयात
माझी भातुकली मांडे,
बालपण वेचले मी रामाच्या या पोळीवर,
डाव खेळताना मोडे नेमकाच घडीवर
घडी घडीला आठवे आज रामाचे देऊळ,
जाते देवळाची वाट माझ्या वाडयाच्या जवळ,
माझा वाडा चिरेबंदी,
भव्य दार हुरमंजी,
मन चौकातच मध्ये
घुटमळे वृंदावनी,
घुमे अडणा दाराचा वाडाभर करकर
त्याचा रूबाबच सांगे, कुणा नाही त्याची सर
मुख्य वाडयाच्या गस्तीला ठाके चौघडा-सोपा
सांज पहाटेला दुमदुमे सनई चौघडा
सदर उजव्या अंगाला, पुढे सोनाराचा सोपा
सदा आपुलकी रांधे माझ्या चुलीचा हा खोपा
माझ्या वाडयातच गोठा आणि तबेलाही तिथं
उभा मर्जीतला घोडा, गाई नांदतात इथं
अश्शा वाडयात या माझ्या
साऱ्या आठवणी ताज्या
राम पालखीला येई
त्याचा किती गाजावाजा
देवघरी ही समई, सांज तेलवात तेवे
गुण्या गोविंदाने गाई, इथे नाही हेवे-दावे
ऐकू येई घंटानाद, संगे मायेची ती हाक
ये गं परतूनी पोरी.. सांगे निरोपाचा हात
सुने रान माझ्याविना, सुने शिवार फुलेना,
सुनी तट्टयाची ती गाडी, सुने मोटेचे ते पाणी
कानी नाही झुळझुळ, नाही घुंगुराची माळ
जोडी खिल्लारी राहिना, नाही ऊसाचं गुऱ्हाळ
गेली भलरी विरून, नाही कापणीची मजा
गेले गोफण नि विळा, गेली चावडीची सजा,
कोण पुसे पावलीला, आधल्याला, आठव्याला,
कोण पुसे माणसाला, पिंपळाच्या मुंजाबाला
आज पडका झडका गाव, परका परका वाटे
वाटेतले तळे एकाएकी पार आटे
धूमी धुमसते आत, तिला उंडयाचीच आस
पाणी शेंदताना जस्सा लाडे विहीरीचा जाच,
काच सुटला कधीचा, जीव मातीतच मळे
सूरपारंब्या मारूनी जीव हुतुतूही खेळे
जीव पारिजात होई, जीव निर्माल्यात सुके
जीव टाळात कुटूनी, पायी विठूच्या या झुके
जीव चोपाळयात झुले, जीव गवळणीत डोले
जीव पहाटेच्या पिंगळाच्या कंदिलाला भुले,
जणु त्याने दाखविली मला उजेडाची वाट,
वाट चालायाला हवी कशी फिरवू मी पाठ,
पाठ गावचा हा पाढा आणि गावचाच ओढा,
ओढी मागे मागे जीव, पडे मायेचाच वेढा
डोळे भरूनीया येती, गळा दाटूनी गं येतो
मातीच्या या विरहाने जीव कस्सानुसा होतो,
दूरदूरच्या देशांना.. दाही-दाहीच्या दिशांना मला जायलाच हवे, मला जिंकायाला हवे,
'लेक परक्याचे धन' मला खोडायाला हवे,
माती देईलच बळ, माती दावील आभाळ,
घरी परतूनी येता, माती करील जवळ!!

Thursday, 9 July 2015

Inspiration : सिव्हिल इंजिनिअर झाला शेतीचा ‘ब्रॅंड अॅम्बॅसिडर’

Thanks to esakal.

यशस्वी लोक वेगळं काही करण्यापेक्षा आहे तेच काम वेगळ्या पद्धतीने करतात. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे मुखई (ता. शिरूर) येथील दीपक हिरवे हे युवा शेतकरी. सिव्हिल इंजिनिअर म्हणून इमारतींचे इमले उभे करण्याऐवजी त्यांनी चार वर्षांपूर्वी राज्यात सर्वप्रथम ‘सबरफेस’ तंत्रज्ञान वापरून उसाचे एकरी १०० टनांपेक्षा जास्त उत्पादन केले. या कर्तृत्वावर ते आता ‘फिनोलेक्‍स’ कंपनीचे ‘ब्रॅंड अॅम्बॅसिडर’ म्हणून देशभर फिरत आहेत.


शिरूर तालुक्‍यातील पश्‍चिम पट्टा म्हणजे नेहमीच दुष्काळी. या परिसरातील मुखई म्हणजे कोरडवाहू शेतकऱ्यांचे गाव. मात्र सन २००० च्या दरम्यान ‘चासकमान’च्या कालव्याचे पाणी या भागात फिरले आणि या भागातील शेतकऱ्यांचे नशीबही पालटले. पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात सन १९९६ ते २००० या दरम्यान ‘सिव्हिल इंजिनिअरिंग’चे शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या मुखई येथील दीपक साहेबराव हिरवे यांनी एका बांधकाम व्यावसायिकाकडे नोकरी पत्करली. मात्र कालव्याचे पाणी आल्यामुळे आपण शेतीतच ‘करिअर’ करू, असा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी गावाकडे वडील आणि प्रकाश व संतोष या दोन भावांच्या मदतीने सर्व प्रथम पाटबंधारे खात्याकडून पाणी उचल परवानगी घेतली. दहा लाख कर्ज घेऊन त्यांनी जवळपास ३.५ किलोमीटरवरून आपल्या शेतात पाणी आणले. 

या पाण्याच्या जोरावर पहिल्या वर्षी हळदीचे पीक घेतले. मात्र यात तोटा झाला. त्यामुळे पुढील वर्षी ऊस लागवड करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पारंपरिक पद्धतीने शेती करीत पुढील सात वर्षे दीपक यांनी आपल्या शेतात विविध प्रयोग केले. मात्र सन २०११ मध्ये त्यांनी जिल्ह्यातील शेती तज्ज्ञ, ‘अॅग्रोवन’, ‘सकाळ’ची प्रगती पुरवणी आणि इंटरनेटच्या माध्यमातून परदेशातील कृषी घडामोडींची माहिती संकलन केली. त्याच्या आधाराने आपल्या शेतात सबरफेस तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला. जमिनीखालून ठिबक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असलेल्या या नवीन तंत्रज्ञानावर त्यांनी पहिल्याच वर्षी ‘बेड’ पद्धतीने ऊस लागवड केली. या प्रयोगाची त्यांना धास्ती होती. मात्र पहिल्याच प्रयत्नात त्यांनी एकरी १०० टनांपेक्षाही जास्त उत्पादन घेतले. 

त्यांच्या या प्रयोगाचे परिसरात आणि शासनाच्या कृषी विभाकडूनही कौतुक झाले. त्यांचा हाच प्रयोग पाहायला मग राज्यभरातून अनेक शेतकरी येऊ लागले. अर्थात, या संपूर्ण तंत्रज्ञानात त्यांनी पाइप क्षेत्रात नावाजलेली ‘फिनोलेक्‍स’ कंपनीचे काही साहित्य वापरले. कंपनीच्या सर्वच प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या शेताला भेटी दिल्या. सबरफेस तंत्रज्ञानाचा प्रयोग आणि ‘फिनोलेक्‍स’च्या या पुढील कृषी संशोधनासाठी चांगल्या नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शोधासाठी दीपक हिरवे हे ‘फिनोलेक्‍स’चे ‘ब्रॅंड अॅम्बॅसिडर’ झाले. त्यातून ते संपूर्ण देशभरात चमकले.

सबरफेस तंत्रज्ञानाने ठिबक करीत असताना त्यांनी ‘बेड’ पद्धतीने ऊस लागवड केली असली; तरी पूर्ण शेती कमी मनुष्यबळात व्हावी, म्हणून त्यांनी दहा फुटांच्या पट्टा पद्धतीने लागवड केली. त्यामुळे मशागतही अत्यंत सुलभ झाली. सिव्हिल इंजिनिअर म्हणून इमारतींच्या जंजाळात अडकण्यापेक्षा दीपक हिरवे यांनी शेतीत दाखविलेली निष्ठा त्यांना एवढी कामाला आली, की १४ एकर शेतीत आणखी १४ एकराची भर केवळ शेती उत्पन्नावर पडली.

पाणी वितरण केंद्रित पद्धतीने
आता दीपक हिरवे यांनी सर्व एकूण २८ एकराला ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देण्यासाठी कल्पकता वापरली आहे. त्यासाठी त्यांनी पाणी वितरण केंद्रित 
पद्धतीने सुरू केले आहे. त्यात संपूर्ण २८ एकरांतील पाइपलाइन एका ठिकाणाहून नियंत्रित करता येईल, अशी यंत्रणा कार्यान्वित केली. यासाठी त्यांना १० लाखांचा खर्च आला; तरी भविष्यातील कितीतरी कष्ट आणि मनुष्यबळ त्यांनी या निमित्ताने वाचविले. 

शेतात २५ केव्हीए क्षमतेचे जनरेटर 
विजेच्या अनियमिततेवरही त्यांनी नामी उपाय शोधत २५ केव्हीए क्षमतेचा साडेचार लाख रुपयांचा एक जनरेटरच शेतात बसविला. यामुळे कुठल्याच अडथळ्यांशिवाय २८ एकर शेतीतील ऊस उत्पादन काढणे शक्‍य झाले. लवकरच ‘फिनोलेक्‍स’ त्यांना इस्राईलच्या तंत्रज्ञानाची ‘गॅलकॉन’ कंपनीची सुमारे ३० लाख रुपये किमतीची ‘टोटल फर्टिमिक्‍स ऑपरेटिंग सिस्टिम’ शेतात बसवून देत आहे. त्यामुळे माती परीक्षण करून २८ एकरांचे वेगवेगळे विभाग केले. सर्व शेतात संगणकीय नियंत्रणाने व स्वयंचलित पद्धतीने खत वितरण लवकरच सुरू होणार आहे. संपूर्ण पुणे जिल्हा तसेच कर्नाटक व गुजरात तसेच ऑस्ट्रेलियातील अनेक शेतकऱ्यांनी दीपक यांच्या नवीन प्रयोगांना आवर्जून भेटी देऊन कौतुक केले.

दीपक यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग करून शेती यशस्वी केली. पुढे शेती पाहून गावकीच्या राजकारणात केवळ सात सदस्यीय ग्रामपंचायतीत स्वत: आणि पत्नी विद्या एकाच वेळी ग्रामपंचायत सदस्य झाले. मागील वर्षी हा गडी मुखई गावाचा सरपंचही झाला. आता राजकारणातून निवृत्ती घेऊन फक्त शेती विकास, हाच ध्यास घेण्याचा निश्‍चय केला आहे. 

‘‘बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांची भेट आपल्यासाठी खूप प्रेरणादायी ठरली. पत्नी विद्या, मोठा भाऊ प्रकाश तसेच लहानगा संतोष यांच्या पाठबळावरच आणि फिनोलेक्‍स कंपनीच्या मदतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोचलो.’’

(दीपक हिरवे यांचा संपर्क क्रमांक ः ९९७०३ ९७६३३)

Sunday, 5 July 2015


नवीन दासबोध






whatsapp वर हे आधुनिक श्लोक पावले ! कवी चे नाव नव्हते .


II मनाचे श्लोक - आजच्या युगातले, II

विषय- लाइफ स्टाईल मॅनेजमेंट
(रामदास स्वामींची क्षमा मागून)

वॉटसएप
         मना सज्जना, हाती वॉट्‌सएप नकोरे
         उतू दूध जाई, कुकर शिट्टी मारे
         पती दावी क्रोध, भुकेलेली पोरे
         बुडे बोट संसार, व्यसन नाही बरे  II
व्यायाम-
         प्रभाते मनी देह हा जागवावा,
         पांघरुणात लोळून, वाया न जावा
         नमस्कार घालावे , सूर्यासी दहा
         दिवस जातो आनंदे, मित्रांनो पहा II 
फास्ट फूड-
         मना सांग पा, जेवणा काय झाले ?
         पोळी भाजी सोडोनी, बर्गर मिळाले
         चढे चरबी अंगा, ड्रेस तंग सगळे
         वजन काटा पाहूनी, मिटुन घेई डोळे II
बैठी जीवन शैली-
         घरी यावे ऑफीस मधूनी उशिरा
         टीवी बघत खावा, फास्ट फूड कचरा
         सकाळी ना होई, मलाचाही निचरा
         कुठुन येई शक्ति, आरोग्यास विसरा II


अध्यात्म-
        नको रे मना, लागू भोंदूच्या नादी
        नको अंधश्रद्धा, नको घेऊ उदी
        सद्गुरु खरा तो, मनाचा विवेक
        नको घालवू वेळ, हृदय सांगे ऐक II
   
मद्य-
        मना सज्जना मद्य, भयंकर पाश
        घरा राख रांगोळी, होई सर्वनाश
        नको तो सुधाकर, नको तोच प्याला
        सुरुवातीस एक, मग घरीच मधुशाला II

धूम्रपान-
        मना सांग का ओढिशी धूम्रकांडी
        फुफ्फुसास भोके, आरोग्यही सांडी
        हृदयास झटके, व्यसन हाचि रोग
        आयसीयूत नेई, कर्माचाच भोग II

टेन्शन-
         विचारी मना तूची शोधुनी पाहे
         टेन्शन किती या आयुष्यात आहे
         उद्याचे कसे हो, मना जाळी चिंता
         प्याला अमृताचा, तोही भासे रिता
         किती हवा पैसा, नको धावू मागे​
         आयुष्य निसटले, आता व्हावे जागे II


कर्ज़-
         नको रे मना, काढू भले मोठे कर्ज
         गिळे जसा अजगर, दया माया वर्ज्य
         पोखरी मनास, आनंदा सुरुंग
         जितेपणी नको तो , सोनेरी तुरुंग II

            II   जय जय रघुवीर समर्थ II


त्या अज्ञात कवीला प्रणाम केला .मला हा फाॅर्म आवडला मी ही पेटलो आणि अगदी
जोर लावून खालील ओळी लिहील्या...


पाणी पिणे
तहान लागताच पिणे फक्त पाणी
कोला मिरिंडा वा थंडा नको कोणी
जला नेच शांत होती मूत्रपिंडे
विषके फेकूनी शुध्द रक्त हिंडे

साखर
मना सज्जना सांगतो बोल खरे
गरज ना मानवा खाणे ती साखरे
पर्यावरण नाश,एक किलो साखर
साठी लागे पाणी द्वि सहस्त्र लिटर

मॅगी
नको रे मना वाचवू दोन मिनीटे
पौष्टिक खाणे करा पूर्वतयारी नीटे
अजीनोमोटो तयामाजी वीषे
कमी म्हणोनी मिसळीती शिसे

अभ्यास
विचारी मना नको होऊ परिक्षार्थी
विषय समजूनी हो तू विद्यार्थी
सिलॅबस ची चौकट दे तू फेकोनी
ज्ञान आणि माहिती फरक घे जाणोनी

वजन
वाढता वाढे, नुपयोग फारसा
होतो हैराण टाळतोच आरसा
व्हावे तू चल,व्हावे अन्नसाक्षर
कॅलरीचा हिशोब अन् चाला झरझर

आनंद
आनंद नाही विकत बाजारात
आनंद नाही पिकत हजारात
आनंदी रहाणे असे फक्त एक सवय
रोजच्याच गोष्टीत शोधायला हवंय

Attitude / मानसीकता
मना सज्जना हार मानु नको रे
माघार ही, ठार मानु नको रे
एक म्हणे हे होणे नाही
दुजा म्हणे हे होणे पाही.
होणे, न होणे तुमचीच प्रकृती
जशी मानसीकता, तशीच कृती

creativity / सर्जनशीलता
व्यायामी जसे पुष्ट होतात स्नायु 
कल्पकता वाढे  ताण देता उपायु
करताच मनविचार घर्षण
घडतेच नवकल्पनेचे दर्शन
पडताच नवकल्पनेचे बीज
चमकून जाते आकाशी वीज.

------राजेश