मी रिक्षा त बसलो,पर्वतीहून मयूरकाॅलनीत सोलॅरीसजवळ जायला सांगितले.
2:45 pm 23 मे 2017
रिक्षावाला म्हणाला रस्ता सांगा,
"खरं तर मी फक्त पेशंट ला सवारी देतो"
"आता पेशंटला घेऊन आलो होतो,आणि मी पेशंटकडून मी फक्त अर्धे भाडे घेतो" !
माझ्या तार्कीक मनाला हे पटेना...
अर्धे भाडे ?
"हा...बाकी अर्धे भाडे एक मारवाडी सेठ देतो " !!
नवलचं
"हा, पेशंटचे भाडे रु.260 झाले, 130 घेतले, नंतर सेठ कडे जायचे, म्हणायचं, रु 260 झाले होते,
एक शब्द नाही,लगेच रु 130 देणार"
मी ऐकतचं राहिलो.
"बरं त्यांच काही फार मोठा धंदा नाही, छोटंस दुकान आहे, त्यांची मुलं ही त्यांच्या सारखी च दानी आहेत".
एकीकडे खा खा खात सुटलेली भ्रष्टाचारी राजकारणी मंडळी.
दुसरीकडे जानकीसेठ सारखी व्रतस्थ लोक !
कदाचित यांच्यामुळे दुनियेचा नैतिक तोल सावरला जात असेल.
काहिही संबंध नसलेले पेशंट काही रिक्षावाले हाॅस्पीटलला पोचवतात,त्यांच्याकडून अर्धेभाडे घेतात.
मग,
जानकीसेठ समोर उभे रहातात.
जानकीसेठ प्रश्नार्थक पहातो,
जे काही रिक्षाभाडे रक्कम ऐकतो,त्यावर विश्वास ठेवतो,
मारवाडी बुद्धी /हात चालतात,
क्षणार्धात अर्धेभाडे देतो,
No comments:
Post a Comment