Saturday, 6 March 2021

आयेशा, आरिफ आणि साबरमती नदी

लोक का क्रूर होतात.

लोक समोर असलेल्या प्रेमाला का समजू शकत नाहीत?लोक  मुलींना माहेरहून गाडी,टीव्ही,फ्रिज,पैसे का आणायला सांगतात.लोक मटेरीयल च्या मोहापूढे जिवंत मुलीला का मारतात.

तूम्ही बरोबर ओळखलत....

माझा रोख साबरमती नदीमधे नाईलाजाने स्वत:ची जिवंत अस्थीयाँ वाहवून देणा-या आयेशाकडे आहे.



पाहिला तिचा तो व्हिडीओ?.

नसेल पाहिला  तुम्ही तर नकाच बघू.

त्यात ती हसते व म्हणते माझं नव-यावर प्रेम आहे पण त्यानं मला झिडकारलं.

नव-याशी लढा देणा-या वडीलांची ही तिला दया येते, किती कराल,जाऊदे, द्या सोडून बाबा म्हणते ती.


वळून एकदा नदीकडे बघते,

आता हे जग सोडून जायचय ह्या विचाराने तिचा थरकाप उडाला असेल.पण ती composed रहाण्याचा  प्रयत्न करतेय,

कुठलाही शिव्याशाप नाही,

ती प्रेमाबद्दलच बोलते, किती गुणी मुलगी असणार.

(इथं मला आयेशा आणि 'देवा त्यांना माफ कर,कारण ते काय करताहेत हे त्यांना माहित नाही' म्हणणारा ख्रिस्त,यांच्यात साम्य वाटतयं)

मी हवेसारखी किंवा नदीसारखी वहातच रहाणार म्हणे,हे एका कवीमनाचं लक्षण आहे.

ती साबरमती नदीमधे इहयात्रा संपवते.

एका सरळमनाची व्यक्ती या स्वार्थी जगात रहाण्यास unfit ठरली.


हृदय पिळवटून टाकणारी घटना.

समाजात एवढी शक्ती आहे,जगात एवढे दानशूर लोक आहेत, जर मनात आणलं असतं तर आरीफ च्या तुच्छ मागण्या सहज पूर्णझाल्या असत्या.

पण एक अमूल्य जीवन कुणालाही दोष न देता मनातले दुख दाबून सहजतेने निघून गेले, हे अभूतपूर्ण आहे.


"तेरे जहान में ऐसा नहीं कि प्यार न हो,

जहाँ उम्मीद हो इस की वहाँ नहीं मिलता"

(शायर -- निदा फ़ाज़ली)

कहाँ चराग़ जलाएँ कहाँ गुलाब रखें

छतें तो मिलती हैं लेकिन मकाँ नहीं मिलता

कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता

कहीं ज़मीन कहीं आसमाँ नहीं मिलता


आयेशा जगायला पाहिजे होती.

हिंदूस्तान मधील सर्व counsilers / समन्वय-संवादक तुम्ही अजून hardwork करण्याची गरज आहे.



No comments:

Post a Comment